उमरी ( प्रतिनिधी नायगाव मतदार संघात येणाऱ्या कांही दिवसात विधानसभेच्या होणार असून राजकीय क्षेत्रात कवळे गुरुजी आमदार व्हावे असे वातावरणाचा अंदाज तरुणाईला आला असल्याने प्रत्येक गावात तरून पिडी समोर येत आहे . शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी हे सर्व खूप सामान्य कुटुंबातून आल्यामुळे शेतकरी शेतमजूर ग्रामीण भागातील विदारक आर्थिक स्थिती त्यांना जवळून माहिती आहे. म्हणून त्यांनी गेल्या ३० वर्षापासून महाराष्ट्रातील प्रगत भागाचा अनेक वेळा अभ्यास दौरा केला व त्यांना कल्पना आली की आपणही शेतकऱ्यांचे आधार होऊ शकतो.
शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आर्थिक संभथा देऊ शकतो. त्यांना वैचारिक उर्मीने त्यांनी गुळ पावडर कारखाना काढला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करण्यासाठी अनेक संकलन केंद्राच्या माध्यमाने दूध संकलन केले. त्यात शास्वती नसल्याने स्वतः साईकृपा दुध डेरी निर्माण केली शेतकऱ्यांच्या व्यवहारात खेळता पैसा निर्माण केला
त्यात व्यापकता आणून वागलवाडा कारखाना खरेदी करून चालू केला व शंकराव चव्हाण जागरी पावडर कारखाना उभा केला सर्व शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करून त्यांना शेतीबद्दल आत्मविश्वास निर्माण केला अशा रीतीने केवळ ऊर्जा रूपाने या नायगाव विधानसभा मतदार संघात आर्थिक दिशा देणारा तरुणांना ऊर्जा देणारा व प्रशिक्षणाच्या माध्यमाने ज्ञान येणारा
आधारस्तंभ आम्हाला लाभला म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील हा धडाडीचा शेतकऱ्यांचा कैवारी विधानसभेत गेलाच पाहिजे म्हणून या मतदारसंघातील तरुण घरची चटणी रोटी खाऊन गावोगावी जनजागरण करण्यासाठी स्वतःच्या मोटरसायकली घेऊन संवाद यात्रा काढून कवळे गुरुजी आताच्या काळाची गरज आहे असा विचार फिरत बेधुंद होऊन फिरत आहेत. शेती,माती आणि कष्ट यांची सांगड घालणारे कवळे गुरुजी यांना येणाऱ्या विधानसभेत पाठवणारच असा चंग बांधून हे तरुण फिरताना दिसून येत आहेत .