माहूरसह सहस्त्रकुंड धबधबा व इतर स्थळांना दर्शन व पर्यटनासाठी दोन दिवस पूर ओसरेपर्यंत न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
माहूर परिसरात काल रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावात पूर आला आहे जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाच्या टीम जागोजागी तैनात करण्यात आल्या आहेत.
किनवट धानोरा पुलावरून पाणी वाहू लागले आहे त्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि नागरिकांना ही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.