स्मार्ट सिटी सोलापूर शहरात बेशिस्त वाहतुकीने नागरिक त्रस्त आहेत. नवीन रस्ते करताना पूर्वीच्या रस्त्याच्या चुकात कोणताही बदल न करता, नवीन रस्ते तयार करण्यात आले. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.शहरात अरुंद रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्या अद्याप सुटल्या नाहीत. अशातच उलट दिशेने वाहन चालविणारे दुचाकीस्वार त्यांच्यासह दुसऱ्याच्या जिवालाही धोका निर्माण करतात. सोलापूर शहरात काही मोक्याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडी तर होतेच शिवाय अपघातही होत आहेत. अशातच शहरात रंगभवन ते सातरस्ता चौक, शासकीय विश्रामगृह हा रस्ता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























