बनशंकरी नगर शेळगी इथ राहणाऱ्या एका २६ वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून सिद्धेश्वर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. इरम्मा लिंगराज मेळी असे त्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घटना उघडकीस आली. महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. मंदिराच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने फौजदार चावडी पोलिसांनी तो बाहेर काढला. सिव्हिलमध्ये दीर जयराज मेळी यांनी दाखल केले. डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत महिलेच्या मागे पती, दोन मुली, दीर- जाऊ, सासू सासरे असा परिवार आहे. नाईक पाटील तपास करीत आहेत.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...


















