*नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण*
देगलूर/प्रतिनिधि
तालुक्यातील मौजे झरी येथे हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करुन कृषी दिन साजरा करण्यात आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल येथील आर ए डब्ल्यू ई च्या विद्यार्थ्यांच्या वतीने कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेलच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करुन कृषी दिन साजरा केला आहे. हे कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य एम. आर. मुळे आणि प्रा. एस. डी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. डि. राठोड हे होते. तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका अनिता बत्तीलवार, विषय शिक्षक श्रीरामे पाटील मॅडम, राघवेंद्र काळे, सहशिक्षक नितीन पांघरे यांची उपस्थिती होती. यावेळी ए. डी. राठोड, वी. मुंगीलवार यांनी मार्गदर्शन केले. तर विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय कडू यांनी कृषी दिनाचे महत्त्व सांगितले.
या कृषी दिनाचे आयोजन नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेलचे विद्यार्थी अथर्व राऊत, अभिषेक कुलकर्णी, अभिषेक भावणगीरकर, तन्मय कडू, सुबोध दहीवले, विजय राठोड, सौरभ झोडे यांनी आयोजन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौरभ झोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अथर्व राऊत, अभिषेक कुलकर्णी, अभिषेक भावणगीरकर आणि सुबोध दहीवले यांनी मांडले.