गेल्या दाेन वर्षात भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे : गेल्या दाेन वषार्त भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा आपल्या सरकारवर काेणी आणू शकलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आराेप करीत आहेत, ते निराधार असल्याची स्पष्टाेक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्यातील टेंभी नाक्यावर गुरुपाेणिर्मेनिमित्त दिवंगत आनंद दिघे यांना ते अभिवादन करण्यासाठी रविवारी सायंकाळी आले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, आनंद आश्रमात गुरुपाेणिर्मेनिमित्त दिघे यांना अभिवादन करण्यासाठी लाखाे शिवसैनिक येत असतात.
ही परंपरा आजही गेल्या अनेक वषार्र्पासून सुरु आहे. दिघे यांच्या जीवनावर दाेन चित्रपट आले. त्यांचे कार्य एक दाेन चित्रपटात मावणारे नाही. ‘धर्मवीर भाग दाेन’ चित्रपट म्हणजे आनंद दिघे यांना खऱ्या अथार्ने श्रद्धांजली आहे. त्यांनी दाखविलेल्या विचारांवरच आताचे सरकार सुरु आहे. मग शाळा प्रवेश किंवा अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचे काम असाे, अशी सर्व कामे या सरकारकडून केली जात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण याेजना, मुलींच्या माेफत शिक्षणाचा निर्णय असे महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळेच गेल्या दाेन वर्षात भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकलेले नसल्याचा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. उपशहर प्रमुख जगदीश थाेरात आता शिंदे गटात उद्धव ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिक आणि ठाणे उपशहर प्रमुख जगदीश थाेरात यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा देत त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमामध्ये दिवंगत दिघे यांच्या तसबीरीला अभिवादन करण्यासाठी आले हाेते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्याठी मुंबई, ठाणे आणि परिसरातून अनेक शिवसैनिक तसेच सामान्य नागरिक आले हाेते. एका महिलेने तिच्या मुलीला शाेधण्यासाठी उल्हासनगर पाेलिस टाळाटाळ करीत असल्याची कैफियत मांडताच तिला तातडीने शाेधण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेचच फाेनद्वारे ठाणे पाेलिसांना दिले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील एमएमआरडीएकडून काही जुन्या घरांवर कारवाई हाेत असल्याचेही काॅंग्रेसचे आमदार हिरामण खाेसकर यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सध्या पावसाळयात ही कारवाई थांबविण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी एमएमआरडीएच्या विभागीय आयुक्त सतेजकुमार खडके यांना यावेळी दिले.