सांगोला – माणनदी व कोरडा नदीला कॅनॉलचा दर्जा दिला आहे. भविष्यातही माण नदीचे पाणी हटू देणार नाही. तालुक्यातील एक एकरही क्षेत्र जिरायत ठेवणार नाही असे आश्वासन माजी आ.शहाजीबापू पाटील यांनी दिले. ते कडलास जि.प.गटाच्या महायुतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व पं.स.गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांच्या प्रचारार्थ वाटंबरे येथे आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी भाजपच्या राजश्री नागणे पाटील, शिवाजीराव गायकवाड, योगेश खटकाळे, प्रतीक पवार, मधुकर पवार, दत्तात्रय पवार, विकास पवार, सुनील शिंदे, ॲड.महादेव कांबळे, शोभाताई खटकाळे, राणीताई पाटील, उपनगराध्यक्ष नितीन इंगवले, नगरसेविका राणी माने, तनुजा एरंडे, अशोक शिंदे, सुभाष पवार, नगरसेवक माऊली तेली, अरूण पाटील, प्रशांत धनवजीर, काशिलिंग गावडे, तारका खटकाळे, बाळासाहेब आसबे, भागवत शिंदे, अनिल खटकाळे, राजलक्ष्मी पाटील, बाळासाहेब झपके, गुंडादादा खटकाळे, महादेव शिंदे, समाधान खटकाळे उपस्थित होते.
पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, ग्रामविकास खाते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आहे. तसेच शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले व संजय शिरसाट यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. तालुक्यातील दोन्ही आमदारांच्या हातून गेल्या वर्षभरात एकही विकासाचे काम झालं नाही. परंतु मी आणलेल्या साडेपाच हजार कोटी रुपये निधीतून तालुक्याचा विकास आजही सुरू आहे.






















