श्रीपुरमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात स्वागत .
जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शनिवार दि . १३ जुलै रोजी श्रीपूर नगरीमध्ये मोठ्या उत्साही वातावरणात आगमन झाले . यावेळी ग्यानबा तुकारामांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले होते . अकलुज येथिल मुक्काम संपवून व दुपारचे माळीनगर साखर कारखान्याचे भोजन व विश्रांती घेवून पालखीने बोरगाव मुक्कामा साठी प्रस्थान ठेवले . प्रथम महाळुंग हद्दीत
पालखीने प्रवेश केल्यावर महाळुंग नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण , उपनगराध्यक्ष भिमराव पाटील मुख्याधिकारी गोरे पंचायत सदस्य आदींनी पालखीचे स्वागत करून पादुकांचे पुजन केले . या नंतर श्रीपूर मध्ये प्रथम पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्यावतीने स्वागत करण्यात आले यानंतर उपाध्यक्ष कैलाश खुळे , जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे पांडुरंगचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांचे हस्ते पादुकांचे पुजन करणेत आले. त्याचबरोबर ब्रिमासागर डिस्टलरीचे प्रवेशद्वारावर जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, चंद्रकांत भागवत , नरेश पाठक व अधिकारी यांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. पुढे परंपरे प्रमाणे हनुमान मंदिरासमोर पालखी भाविकाना दर्शनासाठी थांबविणेत आली .
यावेळी परिसरातील हजारो अबालवृद्धानी पालखीतील पादुकावर माथा टेकवून दर्शन घेतले. सोहळयातील वारकऱ्याना जगोजागी भोजन,नाष्टा, चहा पानाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये संत वाल्मीकी संघाकडून चहा वाटप, अल्लाबक्ष शेख यांच्याकडून सात हजार लिटर शुद्ध पाणी, मौला पठाण यांच्याकडून ५ हजार भाविकाना भोजन, त्याचबरोबर व्यापारी मंडळ,बेंद्रे परिवार, महावीर शहा परिवार, सुनिल थोरात परिवार , यांचे वतीने भोजन देण्यात आले . या बरोबरच नितिन नाटकळे कुटूंबाने सुमारे १० हजार वारकर्यांना मोफत चहा वाटप केले . .
तसेच श्रीपाद जाधव याने वारकऱ्यांसाठी मोफत दाढी करणेची सोय केली होती बोरगांव हद्दीत पालखीने प्रवेश करताच ग्रामपंचायतच्यावतीने तोफांची सलामीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहकार महर्षि साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील, उपसभापती प्रतापराव पाटील व उपसरपंच मदनसिंह पाटील, सरपंच , पोलिस पाटील मनीषा पाटील व सदस्य यांनी पालखी सोहळयाचे स्वागत करून दर्शन घेतले यावेळी पालखी सोहळा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी प्रथमच पारंपारिक बोरगाव गावातील मुक्कामाचे ठीकाण बदलून बोरगांवचे अलीकडे अर्धा किलोमिटर अंतरावर नवीन पालखी तळावर भव्य शमियाना उभारण्यात आला होता त्याठीकाणी पालखी विसावली . पालखी तळासाठी याठीकाणी शेती महामडळाचे जागेत महाराष्ट्र शासनाने उत्तम सोय केल्याने सर्व वारकरी खुष होते .श्रीपूर मध्ये तुकाराम महाराज पालखी सोहळा असल्यानंतर उत्साहात स्वागत करण्यात आले .