उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात आज, शनिवारी मोठा रस्ता अपघात झाला आहे. यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर स्थानिक गावकरी आणि पोलीस मदत आणि बचाव कार्य सुरू केलेय. मृतकांमध्ये 7 लहान मुले आणि 8 महिलांचा समावेश आहे.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कासगंजमधील पटियाली दरियावगंज रस्त्यावर एक अनियंत्रित ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडली. ट्रॉलीमध्ये प्रवास करणाऱ्या 15 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी एकच गोंधळ आणि आरडाओरडा झाला. त्यानंतर परिसरातील गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले. तलावातून बाहेर काढण्यात आलेल्यांना उपचारासाठी पतियाळी येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अपघाताला बळी पडलेले सर्वजण एटा जिल्ह्यातील असल्याची माहिती सीएमओ राजीव अग्रवाल यांनी दिली.