शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने समाधान नगर येथील भागात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाणी आले नसल्याने या भागातील नागरिकांनी गुढीपाडवा दिवशी महापालिका गेट समोर घागरी घेऊन ठिय्या आंदोलन केले, अक्कलकोट रोड येथील समाधान नगर सह आसपासच्या नगरांमध्ये गेल्या आठ दिवसापासून पाणी आले नाही, आज गुडी पाडवा सण असून देखील पाणी सोडण्यात आले नाही, अधिकारी यांना फोन करून विचारले तर ते समाधानकारक उत्तर देत नाहीत, त्यामुळे आज संतापून समाधान नगर भागातिल महिला आणि नागरिकांनी महापालिका गेट समोर बसून आंदोलन करत घागरी फोडल्या आणि प्रशासनाचा निषेध केला, दरम्यान आम्हाला व्यवस्थित पाणी मिळावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे,दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक तेथे तात्काळ दाखल झाले, आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















