चारधाम यात्रा यात्रा सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. बद्रीनाथमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर सहा इंच बर्फ साचला आहे. बर्फवृष्टीमुळे यात्रेची तयारी खोळंबली आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडणार आहेत. केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिल रोजी उघडणार आहेत. 22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडतील. चारधाम यात्रेसाठी विक्रमी संख्येने भाविक पोहोचण्याची शक्यता आहे. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खराब हवामानामुळे यात्रेकरूंना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. केदारनाथमध्ये काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...