तब्बल पन्नास वर्षानंतर शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिरा समोरील नगर परीषदेच्या जागेवरील दुकाने व बांधकाम नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत जमीनदोस्त करण्यात आले. पालकमंत्री श्री संदीपान भुमरे यांनी दिलेल्या आश्वासन नंतर येथील काही दुकानदारांनी आपापल्या दुकाना काढून घेतल्या तर काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने पक्के बांधकाम काढण्यात आले.
अतिक्रमण जमिनदोस्त झाल्याने आता खंडोबा मंदिर व आठवडी बाजार परिसरातूनच नाथ मंदिराचे दर्शन होत आहे. राज्यातील क्रमांक २ ची मोठी यात्रा असलेल्या नाथषष्टी यात्रा मोहोत्सवला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी संतोष आगळे,डीवायएसपी डॉ विशाल नेऊल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या संयुक्त पथकाने आज रविवार सकाळी १० वाजल्यापासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. नगर परिषदेच्याजागेवर संत एकनाथ महाराज समाधी मंदिर मुख्य कमानी समोर गेल्या कित्येक वर्षांपासून नगर परिषद भोगवटा धारक प्रसाद विक्री व छोटी मोठी व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत होते.
अश्या ७५ अतिक्रमण धारकांना नगर परिषदेच्या वतीनेअतिक्रमण निष्काशीत करण्याची नोटिस बजावण्यात आली होती.यावर नगर परिषदेने रविवारी मोठा पोलीस बंदोबस्त मागवून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. शंभराच्यावर नगर परिषद कर्मचारी, स्वत डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, तीन उपपोलीस निरीक्षक पन्नासच्या जवळ पोलीस व दंगा काबू पथक, दोन जेसीबी, चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने वरील मोहीम यशस्वी करण्यात येत आहे. मंदिर कमानीच्या डाव्या बाजूला असलेल्या संतनगर याठिकाणी ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली.
नगर परिषदेत गाळ्यांसाठी येथील ४० भोगवटा धारकांना लाखो रुपये रुपये भरले होते. मागच्या वर्षी गाळे पाडले आता कच्ची पक्की दुकाने ही पडल्याने येथील भोगवटादार जमिनीवर आले आहेत. या व्यापाऱ्यांच्या शिस्तमंडळाने पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडळी होती यावेळी नगर परिषदेने कायदेशीर प्रोजीसर करून या व्यापारींसाठी गाळे बांधणी करावी यासाठी निधी दिला जाईल असे आश्वासन पालकमंत्री श्री संदीपान भुमरे यांनी दिल्याने या ठिकानावरील अनेक दुकानदारांनी आपापली दुकाने काढून घेतली व मोहिमेला विरोध ही केला नाही.
नपच्या अतिक्रमण पथकात मुकुंद महाजन, व्यंकटी पापुलवार, फिरोज पठाण, अरुण गायके, आश्विन गोजरे, अशोक मगरे, आनंद केदार, ऋषिकेश जगताप, कैलास मगरे, मदन गुसिंगे, धर्मराज उजगरे, अशोक पगारे, शुभम वावधने, सचिन ससाणे, गणेश सानप,अमोल शेजुळ, जयसिंग सांगळे, मनोज दुलगज, राजू पगारे, राम कांदवणे, राजू रुपेकर आदींसह मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी यांचा सहभाग होता.