भोकर शहरातील सुभेदार रामजी आंबेडकर चौक उमरी- म्हैसा बायपास रोड ठिकाणी शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान भोकरहुन उमरीकडे जाणाऱ्या एम एच २६ ए सी ४१५७ क्रमांकाच्या ॲप्पे ऑटोला तेलंगणातून नांदेडकडे भरधाव वेगात जानाऱ्या एपी ०७ टीजी २२५९ क्रमांकाच्या ट्रकने जोराची धडक दिली या धडकेत तालुक्यातील रायखोड येथील ऑटोत बसलेले प्रवासी महीला कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड वय ५० वर्ष ह्या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती लक्ष्मण कोईलवाड व बाळू मारोती बुद्देवाड प्रवासी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर भोकर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. अपघात बाबद भोकर पोलीसात गून्हा प्रक्रिया चालू असुन पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अनिल कांबळे हे करीत आहेत. ट्रॅक चालक अपघात ठिकाणी ट्रक सोडून पसार झाला आहे.
भोकर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी येथील राष्ट्रिय महामार्ग उपविभाग ( विशेष ) भोकर यांना अनेक वेळा निवेदने देवुनही याठिकाणी गतिरोधक बसविले नाही. या विभागातील अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणामुळे व बेजबाबदारपणामुळे
सदरील चौकात अपघाताची मालिका गेल्या अनेक वर्षापासून चालू असून ह्या चौकात मागील चार वर्षांत अनेक लोकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या उमरी बायपास रोडवर उडाणपूल करावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...