मणिपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने केली जात आहेत. याच अनुषंगाने गोंदिया शहरातील नेहरू चौक येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि नागरिक या कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते.
दरम्यान, मणिपूर येथे घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या सर्व भारतीयांनी निषेध करायला पाहिजे असा संकल्प करण्यात आला. तर, यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी या घटनेवर भाषण करत सर्वांचे लक्ष वेधले.