वातानुकूलित, आरामदायी आणि वेगाने धावणारी गाडी म्हणून वंदे भारत एक्सप्रेसची ओळख होती गाडी सुरू झाल्यापासून गाडीबाबत एकही तक्रार आली नाही असे नुकतेच रेल्वे प्रशासनाने सांगितले होते मात्र बुधवारी गाडीत एक्सपायरी डेट संपलेलं बिस्किट प्रवाशांना दिल्याची घटना समोर आली आहे नागेश पवार हे वंदे भारत मध्ये सी 5 या कोच मध्ये प्रवास करताना त्यांना सकाळी चहा सोबत देण्यात आलेल्या बिस्कीटचे एक्सपायरी डेट संपलेलं असल्याचं लक्षात आलं,25 फेब्रुवारी 2023 ला एक्सपायरी झालेले बिस्कीट त्यांना गाडीत देण्यात आलं याबाबत नागेश पवार यांनी रेल्वे कडे तक्रार केल्याचं सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...