या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर काही रुग्णांनी आम्हाला काही औषधे मिळत नाहीत, ती बाहेरुन घ्या असे कर्मचारी सांगतात अशी तक्रार केली. तेव्हा डॉ. भारती पवार या तात्काळ औषध वाटप होत असलेल्या रुग्णांच्या रांगेत औषध घेण्यासाठी थांबल्या. त्यांचा नंबर आल्यानंतर संबधित कर्मचाऱ्याने रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर काही रुग्णांनी आम्हाला काही औषधे मिळत नाहीत, ती बाहेरुन घ्या असे कर्मचारी सांगतात अशी तक्रार केली. तेव्हा डॉ. भारती पवार या तात्काळ औषध वाटप होत असलेल्या रुग्णांच्या रांगेत औषध घेण्यासाठी थांबल्या. त्यांचा नंबर आल्यानंतर संबधित कर्मचाऱ्याने रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले.
रुग्णांच्या नाव नोंदणी विभागात कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी रांग लागलेली होती. ही परिस्थिती पाहून आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी वरीष्ठ आधिकाऱ्यांना बोलावून या बाबत विचारणा केली आणि त्यांची कान उघाडणी देखील केली. अचानक केंद्रीय मंत्री रुग्णांच्या रांगेत उभ्या राहिल्याने प्रशासनाची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.