सध्या देशातले राजकीय आणि सामाजिक वातावरण वेगाने रसातळाला चालले आहे हे लक्षण चांगले नाही. या गोष्टीचा वारंवार प्रत्यय येत आहे. देशाची प्रतिमा मलीन करणे आणि देशात यादवी निर्माण व्हावी या हेतूने देशातला विरोधी पक्ष कार्यरत झाला आहे याची साक्ष सोमवार, १ जुलै २०२४ या दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाने दिली आहे.
राहुल गांधींचे संसदेतील भाषण देशात अराजक निर्माण व्हावे आणि देशातील शांतता सुव्यवस्था नष्ट व्हावी याच हेतूने केलेले भाषण आहे. असे निश्चितपणे सांगता येते. संसदेच्या सभागृहातले त्यांचे हे भाषण म्हणजे नाक्यावरच्या चांडाळचौकडी समोर असभ्यतेने आणि बेदरकारपणे केलेली बकबक आहे. एकंदरीत राहुल गांधींचे भाषण, त्यांची देहबोली त्यांचे वर्तन सारेच सभागृहाची मानहानी करणारे आहे. अशा प्रकारचा विरोधी पक्षनेता जगाच्या पाठीवर कुठेही आढळणे शक्य नाही.
घटनेने जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काही मर्यादा आहेत. त्या सर्व मर्यादांचे उल्लंघन राहुल गांधींनी करुन घटनेलाही लाथाडले आहे.
सामान्यपणे सत्ताधारी पक्षावर आरोप प्रत्यारोप करताना विरोधी पक्षनेता अत्यंत जबाबदारीने बोलत असतो. तसेच त्यांनी केलेल्या आरोपात कसे तथ्य आहे ते तो आपल्याकडील माहितीचे दाखले देऊन आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. काल राहुल गांधींनी यापैकी कोणतीही गोष्ट केली नाही.
राहुल गांधींनी केलेले सारे आरोप तथ्यहीन आहेत. सैन्य दलातील अग्निवीरांना चिथावणी देऊन बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा त्यांचा मानस त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत होता. त्यांचे या विषयावरील भाषण म्हणजे सैन्य दलात फूट पाडून देशात आराजक निर्माण व्हावे हा आहे हे स्पष्ट होते.
संरक्षण मंत्री राहुल गांधींनी केलेल्या आरोपाचे खंडन करत असतानाही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कोणतेही दाखले न देता आपलेच म्हणणे कसे खरे आहे हे सांगण्याचा त्यांचा आततायीपणा सातत्याने चालू होता. संसदेतील सभ्यतेच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन राहुल गांधी वारंवार करत असल्याचे आढळून येत होते.
देशातला प्रत्येक हिंदू हा हिंसक आहे आणि सतत हिंसा करत असतो. असत्य कथन करत असतो असा भयंकर आणि तथ्यहीन आरोप हिंदू समाजावर राहुल गांधींनी केला आहे. एवढेच नव्हे तर भगवान शंकरांची प्रतिमा संसदेत दाखवून त्यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानावरही आघात केले आहेत. त्यांचे हे भाषण म्हणजे हेतूत: हिंदू समाजाला अपमानित करणे एवढेच नसून हिंदू समाज अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कसा विरोध करतो आहे अशी ओरड करण्यासाठी राहुल गांधी पुन्हा गरळ ओकण्यास मोकळे आहेत. त्यांच्या या संसदेतील भाषणा मागचा हेतू देशातले वातावरण बिघडावे हाच आहे.
सध्या देशातल्या विविध भागात मुसलमान समाजाकडून होत असलेला हिंसाचार राहुल गांधींना दिसत नाही. पीडित हिंदूच्या करुण किंकाळ्या त्यांच्या कानावर पडत नाहीत. त्यांच्या दृष्टीला सनदशीर मार्गाने आपल्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणारा हिंदू समाज हिंसक वाटतो. हा राहुल गांधींचा दृष्टी दोष नसून विकार दोष आहे.
त्यांच्या भाषणात देशातल्या विविध स्तरातील नागरिकांवर विद्यमान सरकारकडून अन्याय होत आहे. त्या अन्यायाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी विद्यमान सरकारवर केलेले आरोप हे तथ्यहीन आहेत. कोणताही आरोप करताना ते आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केलेला आढळत नाही. तर केलेला आरोप हा सत्य आहे त्यासाठी पुरावे देण्याची आवश्यकता नाही. अशी बेदरकार भाषा आणि अविर्भाव त्यांच्या भाषणामागचा हेतू शुद्ध नसल्याचे स्पष्ट करतो. संबंधित खात्यातील मंत्र्यांनी दिलेले स्पष्टीकरण स्वीकारण्याचे नव्हे तर ऐकण्याचेही सौजन्य राहुल गांधींनी दाखवले नाही. त्यांचे हे वर्तन म्हणजे संसदेतील कामकाज योग्य प्रकारे होऊ नये म्हणून केलेला प्रयत्न आहे. अशाप्रकारे संसदेच्या कामकाजात व्यत्य निर्माण करून राष्ट्राची आर्थिक हानी काळाचा अपव्यय राहुल गांधी करत आहेत. अशाप्रकारे वर्तन करणाऱ्या संसदेच्या सभासदाला संसदेत बसण्याचा नैतिक अधिकार नाही.
संसदेतील कामकाज सुरळीत आणि संसदेच्या नियमावलीत दिल्याप्रमाणे पार पाडणे हे जेवढे सत्ताधारी पक्षाचे दायित्व आहे तेवढेच विरोधी पक्ष नेत्याचे दायित्व आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या या नियमावलीचा आणि मार्गदर्शन तत्त्वाचा आदर राखला आहे असे म्हणता येत नाही. यावरून आपल्याला असे नक्की म्हणता येते की राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता या पदासाठी अपात्र आहेत कारण त्यांनी देशहिताचा विचार करून केलेले भाषण नाही. त्यांचे भाषण हे विरोधी पक्ष नेत्याचे नसून एका अराजक प्रणेत्याचे आहे, हे स्पष्ट होते.