मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देऊ नका
– कडुबा बोरसे
भोकरदन : भोकरदन मध्ये प्रशासन म्हणजे सावळा गोंधळ त्यातल्या त्यात पंचायत समिती म्हणजे कोणाचा ताळमेळ कोणाला नाही कधी या कधी जा कुठे राहा काम करा नका करू ” दिन जाओ पैसा आओ ” भोकरदन पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला अनेक वेळा पत्र देऊन कळविण्यात आलेले आहे की पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो कामे वेळेवर होत नाही ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्या जात नाही चकरा मारायला लावल्या जातात नियमात न बसणारे काम पैसे देऊन केले जातात परंतु नियमात बसणारे कामाकडे दुर्लक्ष केल्या जाते याबाबत आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी खालील प्रमाणे मागणी केलेले आहेत त्या पूर्ण करून प्रशासनामध्ये सुधारणा करण्यात यावी.
1) कर्मचार्यांना मुख्यालयी राहणे सक्तिचे करावे अन्यथा घरभाडे भत्ता अदा करण्यात येऊ नये.
2) उशीरा येणार्या तसेच वेळे अगोदर पळुन जाणार्या कर्मचार्या बाबत कार्यवाही करुन अभिलेख ठेवावेत.
3) कार्यालयीन कामात कोणतीही शिस्त आढळुण येत नाही. कार्यालयात व परिसरात स्चच्छता केली जात नाही. स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही .योग्य कार्यवाही करावी.
4) कार्यालयात येणार्या नागरीकांना सन्मानाची वागणुक देण्यात यावी.
5) कर्मचारी नागरीकांना उडवाउडवीची उत्तरे देतात. प्रकरणे मुदतीत निकाली काढली जात नाहीत. आवक जावक रजिष्टरचे अवलोकन करुन दप्तर दिरंगाई बाबत कार्यवाही करण्यात यावी. वेगवेगळ्या योजनांचे अनुदान व औजारे तात्काळ वाटप करण्यात यावे.
6) कार्यालयात प्रचंड भ्रष्टाचारी व कामचुकार कर्मचारी आहेत .आपण नियंत्रण ठेवावे कार्यालयीन शिस्त असावी व कामचुकारांना शिस्त लावावी. भ्रष्टाचार बंद करावा.
7) आम आदमी पार्टि ही राष्ट्रीय पार्टि आहे हे आपणास ज्ञात असावे. तालुक्यात राबवीण्यात येत असलेल्या शासकिय योजना व धोरण व कार्यक्रम या बाबत पार्टिला वेळोवेळी माहिती देण्यात यावी. अतिक्रमण धारकांची गांव निहाय यादी उपलब्द करुन देण्यात यावी
8) भोकरदन तालुक्यातील प्रतेक गावासाठी नेमुन देण्यात आलेल्या कर्मचार्यांची गाव निहाय उपस्थित राहण्याच्या दिवसासह यादी उपलब्द करुन देण्यात यावी.
9) अनेक गांवाचे ग्रामसेवक गैरहजर राहात असल्याच्या ग्रामसभा व मासिकसभा घेत नसल्याच्या तक्रारी आहेत तसेच काम न करता कागदावर खर्च दाखवला जात असल्याच्या तक्रारी आहेत आपण नियमाप्रमाणे आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवावे.शिक्षण,महिला व बालकल्याण ,दलीत व दिव्यांगासाठी नियमाप्रमाणे खर्च करण्याच्या सर्व ग्रामसेवकांना सुचना देण्यात याव्यात व केलेला खर्च वेळोवेळी तपासण्यात यावा.
10) सुरु असलेली किंवा मंजुर करण्यात आलेल्या रस्ते ,बांधकाम,वर्गखोल्या व इतर कामांचे ईस्टिमेटची नागरीकांनी मागणी केल्यास तात्काळ झेराॅक्स प्रत देण्याबाबत सर्व संबंधीतांना आदेश देण्यात यावेत.
11) व्यैयक्तिक लाभाच्या योजना, जनावरांचा गोठा ,घरकुल तसेच विहिर अनुदान योजना खोट्या दस्तऐवजांच्या आधारे पैसे घेवुन, अपात्र व्यक्तिना देण्यात आलेल्या आहेत. मंजुरी बाबत चौकशी करुन योग्य कार्यवाही करावी.पडुव असलेले प्रस्ताव तात्काळ मंजुर करावेत.
12) पार्टिमार्फत जनतेच्या प्रश्नाबाबत पत्रव्यवहार करण्यात येतो. वैयक्तिक लाभासाठी पत्रव्यवहार करण्यात येत नाही. पार्टितर्फे देण्यात आलेली निवेदने कायद्याच्या चौकटीत निर्णय घेवुन वेळेत निकाली काढावीत अथवा करण्यात आलेल्या कार्यवाही बाबत पार्टिच्या स्थानिक कार्य कर्त्यांना लेखी स्वरुपात वेळेत अवगत करण्यात यावे. अन्यथा कार्यकर्ते ऐनवेळी आक्रमक झाल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील.
आपला सकारात्मक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा अन्यथा आंदोलना शिवाय पर्याय राहणार नाही व याची जबाबदारी आपली राहील.असा इशारा देखील आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील सोळंके यांनी दिलेला आहे.प्रत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जालना यांना माहिती व योग्य कार्यवाहीसाठी अग्रेषीत करण्यात आली आहे.