जाफ्राबाद प्रतिनिधी :
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथील शेतकरी फकीरबा सोरमारे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कुटुंबासह शेती व्यवसाय व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. दिनांक ६ रोजी शनिवारी फकीरबा सोरमारे हे आपल्या स्वतः पत्नी मुलगा मुलगी चार जण कुटुंबासहित गट क्रमांक ३०३ मधील शेतामध्ये शेतकामासाठी शेतात काम करत होते. याच शेतामध्ये विजेचा ट्रान्सफॉर्मर असून शेतामध्ये विजेच्या ताराही जागोजागी असल्याने पाऊस पडल्याने विद्युत प्रवाह शेतात उतरल्याने जनावरांसाठी गवत घेत असताना त्यांच्या शेतातील डीपी जवळ दुपारी दीड वाजेच्या दरम्यान सागर फकीरबा सोरमारे वय १९ वर्ष यांचा विजेच्या शॉक लागल्याने दुर्दैवी अंत झालेल्या मयताचे नाव आहे.आपला भाऊ शेतात काम करत असताना जमिनीवर पडला त्यावेळेस बहिणीचे लक्ष आपल्या भावाकडे गेले असताना
तिने जोऱ्याने किंकाळी मारत आपल्या भावाकडे सोडवण्यासाठी गेली असता तिलाही विजेचा धक्का लागल्याने
शेजारील असलेला मुलगा शुभम लोखंडे व त्यांचे साथीदार देवदूत म्हणून मदतीला धावून आले व ट्रांसफार्मर मधील विजेचा प्रवाह बंद करून तिघांचेही प्राण वाचवण्यात यश आले. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जाफराबाद तालुक्यात निष्पाप शाळकरी तरुणाला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे सागर सोरमारे आपल्या गरीब परिस्थितीतून जिल्हा परिषद शाळेत प्रथम
क्रमांकाने उत्तीर्ण होत अनेक नाविन्यपूर्ण गुण संपादन केले होते.
व त्यानंतर जालना येथील पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी तो पुढील शिक्षण घेऊ लागला होता. आपल्या आई-वडिलांचे सार्थक व्हावं व आपण काहीतरी बनाव हे ध्येय ठेवून तो आपल्या मेहनतीच्या जोरावर आई-वडिलांसोबत मेहनत करत होता. परंतु नियतीच्या मनात वेगळच काही डाव असल्याने त्याचे आई वडिलांचे स्वप्न अपूर्णच राहिल्याने दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.