सांगोला – शक्तिपीठ महामार्ग मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध करू नये. त्यांच्या मागण्या आपण शासन दरबारापर्यंत पोहोचवू व मोजणीसाठी प्रत्येकाने शेतामध्ये येऊन हद्दी, बोअर, विहीर, ठिबक, पाईपलाईन, दाखविणे गरजेचे आहे. म्हणजे नुकसान होणार नाही. यासाठी बाधित शेतकऱ्यांनी संमती दिल्यास चार पट मोबदला अधिक मिळेल व यासाठी विरोधाची भूमिका सोडा व महामार्ग मोजणीस सहकार्य करा असे आवाहन मंगळवेढा उपविभागीय अधिकारी बी. आर.माळी यांनी श्री दत्त मंदिर नाझरे वझरे येथे आयोजित करण्यात आलेल्या महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत केले. सुरुवातीस शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांनी केले.
शक्तिपीठ मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध आहे. यासाठी आपण कोर्टात जाऊ व मुख्यमंत्र्याची शिष्टमंडळ घेऊन भेट घेऊ व त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगू असे शेतकरी संघर्ष समितीचे ऍड.सचिन देशमुख यांनी यावेळी सांगितले. शक्तिपीठ महामार्गात शेतकऱ्यांना शेअर्स देऊन म्हणजे पार्टनरशिप द्या अशी मागणी शेतकरी राजू पाटील यांनी यावेळी केली.
शक्तीपीठ महामार्ग होऊ नये असे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहेच व झाल्यास श्रीधर स्वामी व संजीव स्वामी महाराज यांचे प्रसिद्ध असलेले येथील श्री दत्त मंदिराचा यात समावेश करा व महामार्गास जोडण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन रविराज शेटे यांनी यावेळी केले. यावेळी प्रा.के.वाय.पाटील, सचिन बनसोडे, तमा पाटील, डॉ.हरिश्चंद्र सोनवणे, मंगेवाडी येथील चंद्रकांत चौगुले, बाळासो शिंदे यांनी शक्तिपीठ विरोधात मत व्यक्त केले.
याप्रसंगी संघर्ष समितीचे प्रकाश सोळशे, सुहास देशपांडे, अमोल खरात, वसंत पाटील, आनंदा कोकरे, मल्हारी चव्हाण, श्रीधर देशपांडे, तानाजी कवठेकर, भारत बनसोडे, सचिन कोकरे, भारत पाटील, विनू बुवा पाटील, पांडुरंग बनसोडे, गंगाधर जोंधळे, बाबुराव जोंधळे, आप्पासो पाटील, पोपट जोंधळे, दीपक शिरदाळे, संजय बनसोडे, लक्ष्मण आलदर, बाबासो सरगर, भारत शेळके, पोपट गुरव, हनुमंत गोसावी, अतुल फसाले, लक्ष्मण जाधव, विजय गुरव, सुरेश शिंदे, सुभाष गुरव, देना पाटील तसेच मंडल अधिकारी हरीश जाधव, हरिभाऊ चांडोले, तलाठी, पोलीस पाटील, भूसंपादन अधिकारी, महामार्ग अधिकारी, नाझरे, वझरे, बलवडी, चिनके, कोळे, यलमार मंगेवाडी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. आभार उत्तम सरगर यांनी मानले.
कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करणे म्हणजे राजकीय स्वार्थापोटी हा महामार्ग करणे व शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे हे बरोबर नाही. येथून चार किलोमीटर अंतरावर नागपूर-रत्नागिरी महामार्ग मोकळा पडला आहे. या महामार्गास शक्तिपीठ महामार्ग जोडा म्हणजे येथील जमिनी वाचतील व सरकारची बचत होईल. परंतु असे न करता शासन शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असेल तर मृत्यूला सामोरी जाऊ परंतु जमिनी देणार नाही असा परखड इशारा संघर्ष समितीचे दादासो वाघमोडे यांनी यावेळी दिला.
 
	    	 
                                




















 
                