तभा वृत्तसेवा येरमाळा – येरमाळा परिसरात सध्या जोरदार पाऊस होत आहेत.जुलै महिन्यात आज पर्यंत पडलेल्या सात दिवसात एकशे सतरा मि.ली.मीटर पाऊस झाला आहे.चौदा तारखेला महिन्यातील उच्चांकी म्हणजे साठ मि.ली. मिटर पाऊस झाला.या पावसात उपळाई (ता.कळंब) येथील तेरणा नदीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कमी उंचीच्या बांधलेल्या पुला मुळे पुलाच्या दोन्ही बाजुने दत्तात्रय डाळे यांचे अर्धा एकर शेत वाहून गेले आहे.याचा महसूल विभागाने पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी अशी शेत वाहून गेलेल्या शेतकऱ्यांने मागणी केली आहे.
२०२०- २१ या वर्षी उपळाई ते पानगाव शेत रस्त्यावर विसलाख रुपये एवढा निधी खर्चून जिल्हा परिषद बांधकाम विभागणे पूल बांधला होता.१४ तारखेला रविवारी दुपारी सूरु झालेला दमदार पाऊस तर रात्रभर पाऊस झाल्याने तेरणा नदीला मोठया प्रमाणात पाणी आले पाण्यासोबत आलेली झाडे झूडपे या पुलात अडकल्याने पुलाच्या दोन्ही बाजुने शेतातून वाहून गेल्याने शेताला दोन्ही बाजुने नाल्याचे स्वरुप आले होते.यात उपळाई येथील दत्तात्रय डाळे यांचे अंदाजे जवळपास अर्धा एकर शेतामधील सोयाबीन पिकासह शेतातील माती वाहून जाऊन नुकसान झाले आहे.
शेतकरी दत्तात्रय डाळे यांनी सदरील प्रकारानंतर तलाठी यांना वारंवार पाहणी करण्याची विनंती करुन ही पाहणीसाठी आजपर्यंत कोणी आले नाही.
कोट… रविवारी झालेल्या पावसाने,व कमी उंचीचा पूल असल्याने आपले अर्धा एकर शेतातील माती सोयाबीन पिकासह वाहून जाऊन नुकसान झाले आहे महसूल विभागाने यांची पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तहसील कार्यालया समोर उपोषण करु.
दत्तात्रय डाळे.
नुकसान ग्रस्त शेतकरी उपळाई.