Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अखेरचा हा तुला दंडवत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 6, 2024
in top news
0
अखेरचा हा तुला दंडवत
0
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अखेरचा हा तुला दंडवत*
==================

शेवटी शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर परागंदा व्हावं लागलंच. आयुष्यात दोन वेळा त्यांना आपला देश सोडावा लागला. आज प्रणब मुखर्जी जिवंत असते तर त्यांना काय वाटलं असतं ? हा प्रश्न विचारण्यामागे एक कारण आहे.

बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर शेख हसीनांचे वडील शेख मुजीबर रहमान हे त्या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. परंतु फार लवकरच तेथे क्रांती होऊन त्यांना वंगबंधू शेख मुजीबर यांना ठार करण्यात आलं. सुदैवाने वाचलेल्या शेख हसीना आपले पती एम.ए.वाझेद मियां, दोन छोटी मुले जाॅय, पुतुल यांना घेऊन १९७५ साली भारतात आल्या. भारतात त्यांनी राजकीय आश्रय घेतला. तेव्हा सरकारने त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची पूर्ण जबाबदारी त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रणब मुखर्जी यांच्या वर सोपवली होती. प्रणब यांनी पूर्ण निष्ठेने ती निभावली. प्रणब व शेख हसीना यांच्यातील निकटच्या संबंधाची ती सुरुवात होती.

शेख हसीना यांचे प्रणबशी चांगले संबंध होतेच पण त्यांच्या पत्नीशीही होते. लवकरच त्यांचे कौटुंबिक संबंध निर्माण झाले.मुखर्जींच्या घरी असलेल्या प्रत्येक कौटुंबिक समारंभात हसीना कुटुंबीय हजर असायचे. मग ते वाढदिवस असोत, स्नेहसंमेलन असोत की सहली असोत. शेख हसीना कुटुंबातील साऱ्यांना मुखर्जी कुटुंबीय आपल्यात सामील करून घ्यायचे. काही ठरावीक लोकांव्यतिरिक्त कोणालाही शेख हसीनांची खरी ओळख सांगितली गेली नव्हती. प्रणब यांची पत्नी इतरांना त्यांची ओळख आपली छोटी बहीण म्हणून करून देत असे. हसीनांनीही ते संबंध निगुतीने जपले.पुढे बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्यावर देखील त्या मुखर्जी कुटुंबियांशी संपर्क ठेवून होत्या. अधूनमधून त्या डाक्क्याच्या जमदानी साड्या पाठवायच्या. मग येथूनही परत भेटी दिल्या जात. एकदा प्रणब यांची मुलगी शर्मिष्ठा बांगलादेशला गेली असता, त्यांनी भावूक होऊन तिला म्हटलं, “तुझ्या आईचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. मी भारतात आले तेव्हा माझे वडील, माझं सारं कुटुंब संपवलं गेलं होतं. मी भावनिकदृष्ट्या कोसळले होते.त्यावेळी अज्ञातवासात असलेली मी तुझ्या आईमुळे सावरली गेली. अन्यथा मी वेडी झाली असते. तिनं आम्हाला तुमच्या कुटुंबात सामील करून घेतलं.तिच्या या प्रेमामुळेच ते खडतर दिवस मी ढकलू शकले.”

हे शब्द फक्त ‘ बोलायचीच कढी आणि बोलायचाच भात ‘ पुरतं नव्हतं. २०१० साली पंतप्रधान असताना त्या भारताच्या शासकीय दौऱ्यावर होत्या, तेव्हा प्रणब यांची पत्नी आजारी होती. तेव्हा ती त्यांना भेटायला जाऊ शकणार नव्हती. तेव्हा शिष्टाचाराचा बाऊ न करता त्या आपली बहीण रेहानासह त्यांना भेटण्यासाठी मुखर्जींच्या घरी आल्या. जेव्हा २०१५ साली त्यांचं निधन झालं तेव्हा त्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीला आल्या. त्यावेळी त्यांना आपले अश्रू आवरत नव्हते.

प्रणब मुखर्जी यांच्याशीही त्यांचे असेच निकटचे संबंध होते. त्या जेव्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, तेव्हा प्रणब साधे केंद्रीय मंत्री होते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधताना शिष्टाचार पाळणे आवश्यक असायचं. पण शेख हसीनांनी ते कधीही पाळले नाहीत. त्या थेट प्रणबना फोन करायच्या. मग ते त्यांना समजावायचे की असं पंतप्रधानाने दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांला थेट फोन करणं शिष्टसंमत नाही. तर त्या बंगालीत त्यांना बोलायच्या ” दादा, राखेन आपनार प्रोटोकॉल. ”

पुढे प्रणब हे तीन आठवडे कोमामध्ये होते. तेव्हा त्या दररोज फोनवर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायच्या. प्रणब यांचं निधन झालं तेव्हा बांगलादेशने एक दिवसाचा दुखवटा पाळला.

मुखर्जी कुटुंबियांशी शेख हसीना नेहमी इमानी राहिल्या.पण बांगलादेशीय मात्र भारताशी इमानी राहिले नाहीत ही भारतीयांची ठसठसणारी वेदना आहे !

आज शेख हसीना ७५ वर्षांच्या आहेत. पुन्हा त्या बांगलादेशात परतु शकतील ? इतिहासाची पुनरावृत्ती होईल ?

सध्या तरी तेथून निघताना त्यांनी आपल्या मायभूमीला ‘ अखेरचा दंडवत ‘घातला असेल.
( संदर्भ: प्रणब, माय फादर
शर्मिष्ठा मुखर्जी)

प्रदीप राऊत

🖋️🖋️🖋️

Post Views: 14
Previous Post

राज्य पात्रता परिक्षा (एसईटी) एप्रिल २०२४ ला झालेल्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला

Next Post

बजाजनगरातील अंतर्गत रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बजाजनगरातील अंतर्गत रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

बजाजनगरातील अंतर्गत रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

ताज्या बातम्या

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचासातपुतेंवर पलटवार जानकर म्हणाले मुर्दाडा ला मारण्यात काय.? #bjp

February 11, 2026

येलदरी रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

February 11, 2026

कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एम पी एल मध्ये माहूरगडचा श्री रेणुका देवी क्रिकेट संघ खेळणार.#viral

February 11, 2026

माहूर येथे होणार 100 खा टांसह. सर्व सुविधा उपलब्ध.#viral #public

February 11, 2026

कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त पारगाव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

February 11, 2026

मला हत्येच्या कटाची माहिती नव्हती.#viral #public #trending #bjp

February 11, 2026

शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा तयारीला वेग ! राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी होणार ! #public

February 11, 2026

काकांचा घातपातच: रोहित पवार..#ajitpawar #rohitpawar #politics #solapur #news

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0675306

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697