सोलापूर – शेतकऱ्यांचा आवाज सोशल मीडियावर प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या गिरमला धर्मण्णा गुरव (औज, ता. दक्षिण सोलापूर) यांची शेतकरी संघटना – सोशल मीडिया, सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
दि. ०१ डिसेंबर २००५ रोजी देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात, त्यांच्या
✔ सोशल मीडियावरील कर्तव्यनिष्ठ कार्याची…
✔ सामाजिक बांधिलकीची…
✔ शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या संवेदनशीलतेची…
✔ आणि संघटनेसाठी समर्पित वृत्तीची..
दखल घेत ही जबाबदारी सोपवण्यात आली.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजीराव नांदखिले आणि शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेतृत्व मा. रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, “शेतीमालाला रास्त भाव” या एककलमी ध्येयासाठी सोशल मीडियावरून प्रभावी जनजागरण करण्याची जबाबदारी गुरव यांच्यावर देण्यात आली आहे.
संघटनेने पुकारलेल्या विविध न्यायिक, राजकीय व सनदशीर आंदोलनांना योग्य प्रसिद्धी देण्याचे आवाहनही नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल गिरमला गुरव यांचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

























