हिंगोली / वसमत: तालुक्यात पर्यावरणाचा मोठा संहार सुरू असून, दररोज झाडांचे अवैध कत्ल खुलेआम चालू आहे. गावोगाव रस्त्यांच्या कडेला, शिवार भागात आणि सरकारी जमिनींवर वृक्षतोडीची तांडवयात्रा सुरू आहे. ट्रॅक्टर, मधून झाडांचे ओंडके थेट आरा मशीन आणि वीट भट्ट्यांवर नेले जात आहेत.
या सर्व अवैध हालचाली दिवसाढवळ्या रात्र बेरात्र सुरू असतानाही, वन विभागाचे अधिकारी मात्र “कुंभकरणाच्या गाढ झोपेत” असल्याचे वृक्षप्रेमीयांच्या म्हणणे आहे. अनेक ठिकाणी झाडे कापण्याचे व्हिडिओ व फोटो पुरावे आहे.
वन विभागाची भूमिका संशयास्पद माफियांना संरक्षण मिळतेय का?
स्थानिकांच्या आरोपानुसार, काही प्रभावशाली व्यक्ती व वन अधिकारी यांच्या संगनमतानेच हा अवैध धंदा फोफावत आहे? आरा मशीनवर झाडांचे ओंडके तुकडे करून तयार लाकूड बनवले जाते, आणि त्यानंतर ते वीटभट्ट्यांवर इंधन म्हणून किंवा फर्निचरच्या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठवले जाते.
सरकारने जारी केलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या आदेशांचा खुला भंग होत असतानाही, वन विभाग गाढ झोपेत आहे. वृक्षतोडीमुळे वसमत परिसरातील हरितपट्टा धोक्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई, उष्णतेची झळ आणि सावलीअभावी त्रास वाढणार आहे.
दररोज उभी झाडे जमीनदोस्त होत असताना, वन विभाग अजूनही गप्प का?.
जर असेच सुरू राहिले, तर काही वर्षांत वसमत परिसर हिरवाईऐवजी राखाडी वाळवंट बनेल.
वन विभागाची निष्क्रियता आणि भ्रष्ट साखळी उघड न केल्यास निसर्गाचा श्वास थांबणार, आणि त्याची किंमत पुढच्या पिढ्यांना मोजावी लागणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी आता वन विभागाविरोधात तीव्र आंदोलनाच करावा लागेल? “जर झाडतोड थांबवली नाही, तर वृक्ष प्रेमींना रस्त्यावर उतरावा लागेल? ”

















