. तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
2023 या खरीप हंगामात कापूस सोयाबीन पिकाची लागवड करून ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागामार्फत ग्रामपंचायत वर पाठवण्यात आल्या आहेत. मात्र जिल्हातील बर्याच शेतकऱ्यांनी नोंद केलेली असून सुद्धा यादीत नाव नसल्याने,व काही अशिक्षित शेतकऱ्यांना ई पिक पाहणी नोंद करता येत नसल्याने तालुक्यातील भरपूर शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे
ई पीक पेरा ऑनलाइन पद्धत सध्या शासनामार्फत राबवल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्याकडे मोबाईलची सुविधा असून सुद्धा कधी कधी रेंज राहत नाही नेट राहत नसल्याने शेतकऱ्यांचा ई पिक पेरा मोबाईल वर भरल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत आहे
मात्र काही शेतकऱ्यांनी ई पिक पेरा ऑनलाईन पद्धतीने भरलेला आहे.. त्यामुळे जालना जिल्ह्यातील ई पीक पाहणी केलेली हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहे.त्या शेतकऱ्यांकडे पावत्या देखील आहेत मात्र त्या शेतकऱ्याची कृषी विभागामार्फत ग्रामपंचायत कडे आलेल्या यादीमध्ये नाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान देखील होणार आहे हे नुसकान जर शेतकऱ्यांचे होऊ द्यायचे नसेल तर कृषी विभागाने ई पीक पेऱ्याच्या याद्या दुरुस्ती करून जिल्हातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट लाभ द्यावा असा निवेदन देण्यात आले
______
अंकुशराव बोबडे
भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, यांनी निवेदन दिले, यावेळी उपस्थित,रमेशराव काळे-भाजप तालुका यज्ञ उपाध्यक्ष, सदाशिव यादव-शोशल मिडिया जिल्हा प्रमुख ,आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते