सोलापूर – अस्थिरोग तज्ञ डॉ.अभिजित वाघचवरे यांनी पुन्हा एकदा आयर्न मॅन चा खिताब मिळवत आखाती देशात सोलापूरचा गौरव वाढवला. शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी युनायटेड अरब अमिरात मधील म्हणजेच यूएई च्या सात राज्यांपैकी
*मस्कत येथील ओमान* येथे पार पडलेल्या हाफ डिस्टन्स आयर्न मॅन स्पर्धेत सोलापूरच्या डॉ. अभिजीत वाघचवरे यांनी उत्तुंग असे यश मिळवले.
पहाटे साडे सहा वाजता सुरू झालेल्या स्पर्धेत भारतातून 60 स्पर्धक सहभागी झाले होते.
तर महाराष्ट्रातुन वीस जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
ओमान च्या अरबी समुद्रात दोन किलोमीटर स्विमिंग केल्यानंतर वाळवटीय ओमान शहरातील सुंदर अशा खड्डे विरहित रस्त्यांवरती 90 किलोमीटरचे सायकलिंग पूर्ण केले
परंतु विरुद्ध दिशेने वाळवंटाकडुन येणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने मात्र येथील सर्व स्पर्धकांची परीक्षा घेतली.
जसा जसा सूर्य वरती येत होता तसा आखाती देशातल्या उन्हाचे चटके जाणवत होते व अशाच कडक उन्हामध्ये हाफ डिस्टन्स आयर्न मॅन स्पर्धेतील शेवटचा टप्पा म्हणजेच 21 किलोमीटर रनिंग पूर्ण केले.
ही संपूर्ण स्पर्धा अभिजीत वाघचवरे यांनी सात तास 21 मिनिटे व 20 सेकंदात पूर्ण केली.
या संपूर्ण आयर्न मॅन च्या प्रवासात त्यांचे आई-वडील
श्री. सत्यवान वाघचवरे व सौ.शीला वाघचवरे त्यांच्या पत्नी डॉ. राजश्री त्यांचे भाऊ डॉ सत्यजित,
वहिनी डॉ .शुभांगी यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळते.
तर वाघचवरे हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ त्यांच्या आयन मॅन ट्रेनिंग मध्ये नेहमीच कार्यतत्पर असतो.
कोच किरण साहू ‘अंबिशियस इंड्युरन्स क्लब’ यांची देखील या आयर्न मॅन च्या तयारीत खूप मदत झाली.
रोजच्या व्यस्त अशा *वैद्यकीय पेशातून* देखील ते स्वतःच्या फिटनेस साठी वेळ काढतात.
व आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आपण कसे प्रयत्न करावेत याचे देखील मार्गदर्शन इतरांना ते नेहमीच करत असतात.
सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्र असू दे किंवा इतर क्षेत्रातील खूप जणं त्यांच्याकडे एक *फिटनेस आयकॉन* म्हणून पाहतात.
युरोप ,आफ्रिका आणि आता आशिया खंडात आयर्न मॅन होणारे हे *एकमेव सोलापूर* *चे आयर्न मॅन* आहेत याचा संपूर्ण सोलापूरकरांना अभिमान आहे.
*आयर्न मॅन- सोलापूर- डॉ. अभिजीत वाघचवरे*
हे आता *सूत्रच* बनले आहे.
“आपण प्रत्येकाने आपल्या रोजच्या धकाधकीच्या ,व्यस्त जीवनात स्वतःच्या शरीरासाठी व मनासाठी रोजचा वेळ काढून आपण तंदुरुस्त कसे राहू हे पाहणे आज काळाची गरज आहे असे डॉ. अभिजीत वाघचवरे यांनी स्पर्धा संपल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितले” .
शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता त्यांनी स्पर्धा पूर्ण केली हे समजताच त्यांच्यावरती व त्यांच्या कुटुंबियांवरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


























