*कृषी मंत्री धंनजय मुंढे व मा.खा.राजु शेट्टी साहेब यांच्या मध्यस्थीने पाचव्या दिवशी मयुर बोर्डे यांचे अन्नत्याग उपोषण तात्पुरते स्थगित*
*कृषी मंत्री धनजंय मुंढे यांचे विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचे व शेतकऱ्यांचा विमा तात्काळ देऊ असे फोनद्वारे मयुर बोर्डे यांना आश्वासन*
जाफ्राबाद प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे गेले पंधरा जुलै पासुन जानेफळ पंडीत येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनास बसले होते.सलग पाचव्या दिवशी एकोनविस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडील व जिल्हा कृषी अधीक्षक जालना यांचे लेखी पत्र घेऊन जिल्हा कृषी अधिकारी कापसे व त्यांच्या सोबत उपविभागीय कृषी अधिकारी पवार, तालुका दंडाधिकारी सारिका भगत, तालुका कृषी अधिकारी शिंदे,पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, व जिल्हा व तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी घेऊन अन्नत्याग आंदोलन स्थळी जानेफळ पंडीत येथे सायंकाळी सहाच्या सुमारास पोहचले.महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंढे यांनी कृषी आयुक्त पुणे यांना सूचना दिल्याने
त्यांनी या अन्नत्याग आंदोलन संदर्भात तात्काळ कृषी अधीक्षक जालना यांना पत्र काढून अहवाल विनाविलंब चोवीस जुलै पर्यंत सादर करावा असे आदेश दिले.दिनांक बावीस जुलै मंगळवार रोजी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक लावण्यात आली या बैठकीला जिल्हा प्रशासनातील प्रमुख सर्व अधिकारी व महाराष्ट्र राज्याचे पिक विमा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंढे यांनी मयुर बोर्डे यांना फोन करून चर्चा केली व फसवणुक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करू असे आश्वसन दिले आपण उपोषण थांबवावे विनंती केली,तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खासदार राजु शेट्टी यांनी देखील कृषी मंत्री धनजंय मुंढे,कृषी आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला,तात्काळ कारवाई करा नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा दिला.
कंपन्यांनी शेतकऱ्यांचे फसवणूक केली विमा दिला नाही त्यांच्यावर कृषी आयुक्त कार्यालय पुणे व जिल्हाधिकारी जालना यांच्या कडील अहवाल सादर झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन स्वीकारल्यानंतर मयुर बोर्डे यांनी जानेफळ पंडीत येथील शाळेतील मुलांच्या हाताने बेमुदत अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले.परतू शेतकऱ्यांचा हक्काचा पिक विमा व फसवणुक करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीतर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे देखील सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगितले.
त्याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी तालुका अध्यक्ष सुभाष भोपळे,यवा तालुका अध्यक्ष शरद पंडीत, तालुका संपर्क प्रमुख प्रदीप नरवाडे, तालुका उपाध्यक्ष गजानन भोपळे, तालुका उपाध्यक्ष राजु बनकर, विद्यार्थी तालुका अध्यक्ष अमोल कंनर,समाधान गाढवे, विष्णु कदम,भिमराव राऊत, योगेश पायघन,आकाश मुरकुटे,गणेश मुरकुटे, प्रमोद गाढवे, सतिश गाढवे,सतिश गायकवाड, राजु गायकवाड, बादल जुंगडा, ज्ञानेश्र्वर सरोदे,कृष्णा गाढवे, नारायण भोपळे, सुदाम शेवत्रे,गजानन कोथळकर, इत्यादिसह कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते