बार्शी – महाराष्ट्र राज्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील व राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. राज्यावर आलेले संकट पाहता ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांचेकडून फूल नाही फुलाची पाकळी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रुपये ११ हजार बार्शी तहसीलदार श्री. एफ.आर. शेख यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी, अजय तिवारी, नागनाथ सोनवणे, सुनील फल्ले, माणकोजी ताकभाते, संतोष हाडगे, प्रा. चंद्रकांत उलभगत, सायरा मुल्ला, रेखा विधाते, रागिनी झेंडे, अलका हाडगे हे उपस्थित होते. हा निधी संस्थेकडे जमा असलेल्या निधीतून देण्यात आला, असे राहुल वाणी यांनी सांगितले.