Thursday, March 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“लक्ष्मीबाईंच्या अश्रूंमधून उभा राहिला रयतचा वटवृक्ष” – प्रा. पोपट काटकर

तरुण भारतbyतरुण भारत
March 19, 2026
in editor
0
“लक्ष्मीबाईंच्या अश्रूंमधून उभा राहिला रयतचा वटवृक्ष” – प्रा. पोपट काटकर
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपू – “स्त्रियांच्या अश्रूंमध्ये परिवर्तनाची प्रचंड ताकद असते; सीतेच्या अश्रूंनी रामायण आणि द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले, त्याचप्रमाणे लक्ष्मी वहिनींच्या अश्रूंमधून रयत शिक्षण संस्थेचा विशाल वटवृक्ष उभा राहिला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य आणि विषमता दूर करण्यासाठी शिक्षणाची चळवळ उभारली; मात्र त्या चळवळीच्या पाठीशी लक्ष्मीबाईंचा निःस्वार्थ त्याग, माया आणि समर्पण यांची भक्कम साथ होती. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आईसारखे प्रेम देणे, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून स्वतःचे सुख त्यागणे, त्यांच्या जीवनात आत्मीयता निर्माण करणे ही कार्ये त्यांनी निष्ठेने पार पाडली.” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. पोपट काटकर यांनी केले.  

येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात समारंभ समिती, सांस्कृतिक विभाग आणि ‘कमवा व शिका’ योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रयतमाउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी. टी. जाधव हे होते. 

या कार्यक्रमाची सुरुवात रयतमाउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच पाहुणे व अध्यक्षांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला. 

 “रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील : जीवन व कार्य” या विषयावर प्रमुख वक्ते प्रा. पोपट काटकर यांनी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागमय जीवनाचा सखोल ऊहापोह केला. ते पुढे म्हणाले की, “ लक्ष्मीबाई यांनी ८० तोळे सोन्याचा त्याग केला. हा त्याग केवळ आर्थिक नव्हता, तर तो सामाजिक बांधिलकीचा आणि मूल्यनिष्ठतेचा आदर्श होता. “स्वाध्याय, स्वावलंबन, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य” या चतु:सूत्रीवर उभ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत लक्ष्मीबाईंच्या प्रेमळ त्यागाचे खत पडले असल्यामुळेच ही संस्था आज वटवृक्षासारखी फोफावली आहे”, असे त्यांनी नमूद केले. लक्ष्मीबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, प्रारंभीच्या सनातनी संस्कारांवर मात करून त्यांनी सर्व समाजघटकांना आपलेसे केले. त्यांच्या आयुष्यातील त्याग, संयम आणि मातृत्वभाव या गुणांमुळेच त्यांना “रयत माऊली” ही उपाधी प्राप्त झाली. “त्यांचे कार्य हिमालयापेक्षा उंच आणि महासागरापेक्षा अथांग आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी “रयत” आणि “ माउली” या संकल्पनांतील मूल्यांचा वेध घेत, लक्ष्मीबाईंच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा शाल, पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुशील शिंदे, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. समाधान माने, पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बलवंत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य विठ्ठल काटकर, कार्यालयीन प्रमुख चौरंगनाथ वाघमारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले, तर समारोप प्रसंगी आभार समारंभ समितीचे चेअरमन डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राजेंद्र मोरे, प्रा. हरिभजन कांबळे, प्रा. बापूसाहेब घोडके, प्रा. अंकुश घुले, प्रा. मोहिनी सावंत,अभिजीत जाधव, अमोल माने, भीमराव मेटकरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ व व्होकेशनल विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 12
Previous Post

लोकप्रतिष्ठा विचार मंचच्यावतीने इफ्तार पार्टी 

Next Post

यमाई तलाव परिसरातील दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कडक उपाय योजना करणे गरजेचे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
यमाई तलाव परिसरातील दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कडक उपाय योजना करणे गरजेचे

यमाई तलाव परिसरातील दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कडक उपाय योजना करणे गरजेचे

ताज्या बातम्या

गॅससाठी सोमवारपासूनएजन्सीसमोर रांगा लावण्याची गरज राहणार नाही.

March 19, 2026

परीक्षार्थीच चोर निघाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे

March 19, 2026

ऑनलाइन बुकिंगनंतर ओटीपीद्वारे ९६ तासांत घरपोच गॅस सिलिंडर

March 19, 2026
विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात; तब्बल 73 हजार रुपये देणगी जमा 

विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात; तब्बल 73 हजार रुपये देणगी जमा 

March 19, 2026
आ. उत्तमराव जानकर यांच्याकडून वेळापूर येथे रोजा इफ्तारचे आयोजन  !

आ. उत्तमराव जानकर यांच्याकडून वेळापूर येथे रोजा इफ्तारचे आयोजन  !

March 19, 2026
धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी

धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी

March 19, 2026
लोकविकासमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस  वितरण संपन्न

लोकविकासमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस  वितरण संपन्न

March 19, 2026
श्रीमल्लिकार्जुन यात्रेस महाप्रसाद वाटपाने सुरुवात

श्रीमल्लिकार्जुन यात्रेस महाप्रसाद वाटपाने सुरुवात

March 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0748131

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697