पिलीव – सोलापूर सांगली सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर सद्गुरु श्री श्री रविशंकरजी तथा गुरुजी यांच्या प्रेरणेने (राजेवाडी) श्री श्री श्रीनगर ता. आटपाडी या ठिकाणी गेली तेरा वर्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांची जीवनमान उंचावण्यासाठी सुरू असलेल्या सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या चौदाव्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमत: कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरी रावसर, व्हॉइस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे शुभ हस्ते चंडी होमाचा विधीपूर्वक करण्यात आला. कारखान्याचे कृषी विभागाचे श्री व सौ सुनील चव्हाण यांचे शुभ हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह भ प बापूसाहेब देहूकर (मळोली) यांचे चेअरमन एन.शेषागिरी राव, व्हॉईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर उदय जाधव, कारखान्याचे सीएफओ रोहित नारा, संचालक मोहन बागल, उषाताई मारकड, श्रावण दादा वाकसे, राजेवाडी विकास संस्थेचे चेअरमन रवींद्र शिरकांडे,, शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे ( पंढरपूर),वस्ताद महादेव ठवरे, ज्योतीराम आवताडे, शामतात्या मदने
या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत व तोफांच्या सलामीत व जय गुरुदेव च्या जयघोषामध्ये अनेक पुष्पाची उधळण करून अतिशय उत्साही वातावरणामध्ये 14 व्या गळीत हंगामाचा मोळी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. चेअरमन एन. शेषागिरी रावसर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सद्गुरु श्री. श्री .रविशंकर जी तथा गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रसमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर उदय जाधव यांनी कारखाना स्थापनेपासून आजच्या चौदाव्या गळीत हंगामापर्यंत कारखान्याच्या कार्याचा लेखाजोखा सांगत आपल्या या कारखान्याला सर्व सभासद शेतकरी बांधव व सर्व क्षेत्रातील घटकांचे सहकार्य लाभलेले आहे, ते भविष्यातही लाभणार आहे.
आपण कारखान्याच्या माध्यमातून प्रामाणिकपणाच्या भावनेतून आपलं कार्य निश्चितपणाने पुढे नेणार आहोत यात शंका नाही असे सांगत कारखान्याच्या प्रगतीचा आलेख सर्व उपस्थितांसमोर मांडला. त्यानंतर जेष्ठ सभासद शामतात्या मदने, ज्योतीराम अवताडे, गणेश अवताडे तसेच शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे यांनीही आपल्या सद्गुरु कारखान्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करून हा कारखाना आपला व माझा आहे हीच भावना कायमस्वरूपी सर्वांनी जौपासली पाहिजे अशा प्रकारचे आवाहन केले. तर ह. भ. प .बापूसाहेब देहुकर महाराज यांनी आपल्या मार्गदर्शन पर आशीर्वचनातून कारखान्याबद्दल गौरवोद्गार काढून आपल्या कारखान्याचा मी सभासद या नात्याने व धार्मिक क्षेत्रातील वारकरी पंथाच्या वतीने कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती होवो व हा कारखाना चंद्र सूर्य असेपर्यंत प्रगतीपथावरच राहणार आहे अशा प्रकारचा आशीर्वाद दिला.
तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून कारखान्याचे चेअरमन एन .शेषागिरी राव यांनी उपस्थितांसमोर आमच्या कारखान्याला आपणा सर्वांची मने कायम व सदैव साथ व मदत हवी आहे. आम्ही “सेवा निसर्गाची उन्नती आपली” या ध्येयाने प्रेरित होऊन सद्गुरु श्री. श्री. रविशंकरजी तथा गुरुजी यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे “समाजसेवा ब्रीद आमचे स्वार्थ सुखाची आच नसे समाजकारणी देह वाहावा एकमात्र हा ध्यास असे” या उक्तीप्रमाणे सरळ मार्गातून मार्गक्रमण करत राहणार आहोत. आपण आम्हाला सदैव सहकार्य करून पाठीशी उभे रहा अशा प्रकारचे वक्तव्य केले.
सदर प्रसंगी सौ. जयश्रीताई वाकसे, काझी मॅडम, तसेच प्रसिद्ध बागायतदार संग्राम दुपडे, हिंगणी येथील काका माने, जनरल मॅनेजर सत्यनारायण रेड्डी, डीजीएम भगवान पाटील, सर्व खाते प्रमुख ,कामगार, कर्मचारी तसेच आटपाडी, पंढरपूर, माण, माळशिरस ,सांगोला, पंढरपूर भागातील मान्यवर त्याचप्रमाणे हितचिंतक तसेच राजेवाडी,इटकी, दिघंची, हिंगणी भागातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी एच आर एन एडमिन मॅनेजर सचिन खटके, शेतकी अधिकारी दत्ता क्षीरसागर यांच्या टीमने परिश्रम घेतले.तर कारखान्याचे संस्थापक संचालक श्रावण दादा वाकसे यांनी आपल्या आभार प्रदर्शनातून सर्व उपस्थितांचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केन मॅनेजर सुनील सावंत व रघुनाथ देवकर यांनी केले.




















