सोलापूर – सोलापूर ही संतांची भूमी आहे या या भूमीनेच जगाला अनेक थोर संत दिले. सोलापूर सारख्या संतांच्या भूमीमध्ये अशा दातृत्वाची खाण आहे. त्यामुळेच सोलापुरात आजही संस्काराच्या रूपातून श्रम आणि निष्ठा ही जपली जाते. त्यामुळेच जगातील पहिले संत साहित्याचे संशोधन केंद्र सोलापूरमध्ये होत आहे. हे सोलापूरकरांचे भूषण आहे. या संशोधनाचे कार्य सार्थ्य करण्याचं काम काशीपीठ करते आहे. याचा आम्हाला गौरव आहे. असे गौरोद्गार काशी जगद्गुरु श्री डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी श्री जगद्गुरु विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठान जंगमवाडी मठ वाराणसीद्वारा संचलित श्री काशी विश्वराध्य संत साहित्य संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
पुढे ते म्हणाले, नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व हे पाटील घराण्याला गुरुकृपेने प्राप्त झालेले आहे. आताच्या पिढीनेही ते जपलेले आहे. त्यांच्या दातृत्वाचा गौरव कायम राहणार आहे. यावेळी काशीपीठ जगद्गुरु श्री डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि श्रीउज्जैन पीठ जगद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी यादव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या अध्यासन केंद्राचे उद्घाटन मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाले.
याप्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीभरत जंगम जंगमवाडी मठ नेपाळ, जगदीश मल्लिकार्जुन पाटील (मल्लिकार्जुन देवस्थान शेळगी अध्यक्ष) तसेच संशोधन केंद्रासाठी वास्तूचे दातृत्व करणारे दानशूर व्यक्ती सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. शैलेश पाटील तसेच अँड. पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. बिल.सी. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. संशोधन केंद्राच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती डॉ.अनिल सर्जे यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवनसिद्ध वाडकर यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. शैलेश पाटील यांनी केले. याप्रसंगी नागणसूर महाराज, जळकोटकर शिवाचार्य, शरणय्या स्वामी सिद्धय्या स्वामी, बसवराज शास्त्री, शिवयोगी शास्त्री होळीमठ, डॉ.लवंगे, डॉ.नागेश येवले, चिदानंद मुस्तारे, विद्यानंद स्वामी, गुरुशांत रामपुरे आदींची उपस्थिती होती.

























