भोकरदन : तालुक्यातील इब्राहिमपूर येथे बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेली एक दिवसीय “दुसरी” धम्म परिषद सोमवार, २ फेब्रुवारी सोमवार रोजी अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे पूज्य भदन्त राहुलराज (छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी प्रांभी उपासक उपाशीका तसेच बालिका यांनी पूज्यभदंत भिक्कूच्या अंगावर फुलांची पुस्पवृस्टी करत गावातून मिरवणूक काढण्यात आली, दरम्यान यावेळी सकाळपासूनच गावामध्ये आनंदाचे वातावरण पहायाला मिळाले,
या परिषदेचे उद्घाटन पूज्यभदंत भिक्कू संघरत्न, पूज्यभदन्त भिकू रोहित यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी यावेळी पूज्यभदन्त भिक्कू कुलीनपुत्र वेस्सभू थेरो,पूज्यभदन्त भिक्कू संघरत्न,पूज्यभदन्त भिक्कू रोहित,पूज्यभदन्त भिक्कू राहुलराज ,पूज्यभदन्त भिक्कू उपतिस्स यांनी उपस्थितीतांना आपल्या प्रवचनामधून बुद्ध धम्माचा संदेश दिला, याप्रसंगी पूज्यभदन्त संघरत्न यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले की बुद्ध सांगतात की प्रत्येक वेळी मंगलमय आहे, धम्माचा आचरण करण्यासाठी म्हणून वाईट वेळ हि कोणतीच नसते व दुःखाची वेळ कोणतीच नसते, ती आपण तयार करतो परंतु धम्माच्या भाषेमध्ये सांगायचं तर धम्माच वारणवार अचारण करण्यासाठी प्रत्येक वेळ काळ हा मंगलमय आहे, तथागत गौतम बुद्धाने आपल्याला 2568 वर्षांपूर्वी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व मानव जातीच्या मंगल साठी खूप छान प्रकारे सद्धम्म दिला आहे, तो सदधम्म अनुयायी आहोत, या जगामध्ये सर्वात प्रथम जर कोणी जगामध्ये दुःखी आहे, तर ते भगवान बुद्धांनी सांगितले आहे, परंतु दुःख भगवान बुद्धांनी सांगितले, दुःखद भगवान बुद्धाने सांगितले नाही तर ते दुःख काय आहे त्याचे कारण ही भगवान बुद्धाने सांगितलं तर आपण चार आर्य सत्य आहे मा नात असतो की दुःख समुदाय, दुःख निरोग, दुःख निरोगी घामेली पतीपदायक हे चार आर्य सत्य भगवान बुद्धाने सांगितले ते त्यांनी यावेळी संबोधित केले.
या परिषदेसाठी आलेल्या शेकडो उपासक-उपासिकांनी भोजनदान करण्यात आले, त्यानंतर सायंकाळी ०८ वाजता मंठा येथील महिंद्रा मोरे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता, या धम्म परिषदेला सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे सरपंच रामसिंग डोभाळ, दिलीप साळवे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प .स. भोकरदन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष सचिन पारखे, बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे सारथी आदित्य सोनवणे, पत्रकार गणेश आवटी , पत्रकार सुरेश बनकर, सुरेश शेळके ,सुरेश गिराम ,आत्माराम चौतमोल, कुणाल पैठणकर, संजय दांडगे, माजी सरपंच सिद्धार्थ वेलदोडे, सरपंच रतन दाभाडे, थुटे सर, गिरी सर, सोनवणे सर, पत्रकार युवराज पगारे, वैभव सोनवणे , कमल किशोर जोगदंड, विश्वास ढसाळ, अमित लोहाडे, प्रताप शेळके, माधु सुरडकर यांच्यासह शेकडो अनुयायीची उपस्थिती होती,दरम्यान धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी पूज्य भदन्त राहुलराज यांच्यासह इब्राहिमपूर येथील समस्त बौद्ध उपासक-उपासिकांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील उपासक उपासिका या परिषदेला मोठी उपस्थिती दर्शवली होती.






















