बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
वाशी येथील धाकटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले तपोवन मधील विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर हे आबासाहेब कोरे महाराज यांनी बांधून पांडुरंगाला वाशी येथे आणले: त्या वेळे पासून तपोवन हे धाकटे पंढरपूर म्हणून गणले जाते. आज आषाढी एकादशी निमित्ताने वाशी तालुक्यातील तसेच भूम व कळंब तालुक्यातील अनेक गावातून वारकरी दिंड्या आल्या होत्या त्यामध्ये इंदापूर, गोलेगाव, सोनेगाव, कन्हेरवाडी, तांदूळवाडी, डिकसळ तालुका कळंब पिंपळगाव या गावातून शेकडो वारकरी सह भाविक दिंडीमध्ये टाळ मृदुंग व अभंग गात तपोवन मध्ये जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेत होते.
सकाळी सहा वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी पद्धतशीर दर्शन घेता यावे म्हणून दर्शन रांगा साठी सहाव्या बॅरिकेट केले होते. त्यामुळे सर्वांचे सुलभ दर्शन झाले दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी तपोवन रोड वरील आदित्य आडमुठे, यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होते. तसेच डॉ. इंगोले व त्यांच्या शेजाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी नायलॉन चिवडा देऊन पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. तसेच भारत कवडे व पांडुरंग कवडे यांनी कन्हेरवाडी येथील दिंडीतील वारकऱ्यांना प्रसाद दिला.
एकंदरीत आज धाकट्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली दरवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते. एकंदरीत अंदाजे ५० हजाराच्या वर भाविक भक्तांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. असे गावातून चर्चा चालू होती, एकंदरीत आज संपूर्ण दिवस विठ्ठल नामामध्ये रममान झालेला दिसून आला.