वाटुर प्रतिनिधी
सा वा, वाटूर सविस्तर वृत्त जालना ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गांवर वाटूर फाटा हे उप बाजार पेठेच गाव असून या महामार्गवरून मोठ्या प्रमाणात वाहणांची वरदळ असते मात्र पावसाळ्यात या महामार्गाला जागो जागी खड्डे पडून अनेक छोटे मोठे अपघात किंवा किरकोळ वाद हे होत असतात त्याचे कारण असे कि गेल्या कित्येक वर्षा पासून या रोड लागत असलेल्या नाल्या या काढण्यात आल्या नसल्याने व काही व्यापारी बांधवांनी दुकाना समोर चिखल होऊ नये या हेतूने आपल्या दुकाना समोर मुरूम टाकला व काहींनी तर त्या वर सिमेंट ची पीसीसी करून घेतली
परिणामी आधीच तुंबलेल्या नाल्या व त्यात पाण्याची अडवलेली वाट या मुळे पाणी हे नाल्यात न जाता चक्क रस्त्यावरून वाहत आहे व पाणी अंगावर उडून पदचारी व वाहन चालक यांच्यात किरकोळ वाद होत आहेत तर कधी कधी रस्त्यावरील खड्डयात पाणी साचल्याने अंदाज न आल्याने दुचाकीस्वार हे अडखळून पडून अनेक वेळा किरकोळ किंवा गँभीर जखमी सुद्धा होत आहेत ज्या मध्ये महिला व बालकांचा समावेश हा मोठ्या प्रमाणावर असून काही ठिकाणी अनेक छोटी मोठी नास्ता सेंटर व स्टॉल आहेत
हे घाणीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने सुद्धा अनेक नागरिक आजारी पडत असून या गँभीर मुद्द्यावर सर्वांची हाताची घडी तोंडावर बोट पहायला मिळते आहे व शासनातील टोलवा टोलवी व दप्टर दिरंगाई व उदासीनता हि साफ दिसून येत आहे दरम्यान या आधी सुद्धा अनेक वृत्त पत्रातून या बाबतच्या बातम्या प्रसिद्ध होऊन सुद्धा कुठलीच हालचाल सबंधिताकडून केली गेली नसल्याने सुद्धा नागरिकां मध्ये या विषयी ची कमालीची नाराजी पहायला मिळत आहे