बार्शी – सप्टेंबर २०२५ मध्ये बार्शी तालुक्यातील अकरा महसूल मंडळांत तीन ते चार वेळा अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले होते.
सदर नुकसानीचे पंचनामे तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरु आहे. मात्र शिक्षणानंतर मुंबई येथे बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत श्री. रवी कोयले यांनी गावाची व शेतीची नाळ कायम ठेवत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून बार्शी तालुक्यात मौजे खडककलगाव व मुंगशी आर या गावामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेऊन ८० ते १०० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक पोते युरिया, एक एकर ज्वारी पेरणीसाठी लागणारे बियाणे व कीडनाशक म्हणून लागणारी इमामेक्टिन बेंजोएट हे कीटकनाशक देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी सर्वांनी परिस्थिती लक्षात घेऊन कोणीही खचून जावू नये व आवश्यकता वाटल्यास यापुढेही शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रवी नामदेव कोयले, उद्योगपती मुंबई मूळचे रहिवाशी शेडशिंगे, वैभव कोयले उपसरपंच शेडशिंगे, पांडुरंग गायकवाड, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, कृषी अधिकारी प्रसन्नजित जानराव, सयाजी गायकवाड, अतुल जगताप, कृष्णा शेळके, सुहास साठे, सौ. रेणुका दराडे, खडकलगावचे सरपंच दीपक रोंगे व मुंगशी आर येथे उपसरपंच संतोष कुरुंद व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

















