राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कर्वेनगरच्या स्वयंसेवकांनी महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त,कर्वेनगर येथील चेतिय – गिरी बुद्ध विहार येथे तथागत भगवान बुद्ध व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. राजेंद्र कापसे यांच्या सोबत सगळ्यांनी बुद्ध वंदनेचे पठण केले. ह्या प्रसंगी अनेक वक्त्यांनी बाबासाहेबांच्या बहुआयामी कार्याचे स्मरण करत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास व कर्वेनगरचे संघचालक उदयन पाठक,अनिल वाघ,सुशील मेंगडे,विठ्ठल बराटे,न्यू सन्मित्र मित्र मंडळाचे कुणाल गायकवाड,विराग साकळे,रमेश साकळे यांची मुख्य उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास आपल्या भाषणात म्हणाले,”विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील एक महान विचारवंत आणि दृष्ट्ये नेते होते. स्वातंत्र्य,समता आणि बंधुता याचा संदेश सर्वांना दिला.कठोर परिश्रमच्या बळावर आपण कोणतेही यश खेचून आणू शकतो हे प्रत्यक्षात आणून दाखवले.बुद्धिमत्ता ही त्यांनी लिहिलेल्या पुस्तक व ग्रंथातून मिळते.त्यांनी दिलेल्या आदर्शवादाचे आपण पालन केले पाहिजे”
कार्यक्रमास कर्वेनगर परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रशांत यादव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सामुहिक प्रार्थनेनंतर प्रसाद वाटप होवून कार्यक्रमाची सांगता झाली.