Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सकारात्मक पत्रकारिता ही समाजासाठी प्रेरणादायी – आमदार अर्जुनराव खोतकर

तरुण भारतbyतरुण भारत
January 7, 2026
in marathwada
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केली जाणारी पत्रकारिता ही समाजाला दिशा देणारी व प्रेरणादायी असून पत्रकारांनी सामाजिक भान जपत जबाबदारीने लेखन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केले.


प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, जालना शाखेतर्फे आयोजित दर्पण दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, पंडित भुतेकर, सर्जेराव जाधव, वाघ महाराज, विनायक दहातोंडे, रमेश खोत, भरत मानकर, प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ व युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खोतकर पुढे म्हणाले की, पत्रकारिता हे केवळ बातमी देण्याचे साधन नसून समाजातील दुःख, वेदना, प्रश्न आणि अपेक्षा शासनापर्यंत पोहोचविणारे प्रभावी माध्यम आहे. जालना शहरातील रेशीम बाजारपेठ व मोसंबी बाजारपेठेच्या विकासात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे. पत्रकारांनी वास्तव मांडल्यास त्याला कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्याची संधी मिळते. मात्र नकारात्मकतेवर आधारित लेखन समाजमन दूषित करते. म्हणून पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लेखन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी व निर्भीड पत्रकारितेची उदाहरणेही दिली.


दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारितेचे जनक
दर्पण दिनानिमित्त उपस्थितांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या पत्रकारितेचे महत्व अधोरेखित केले. दि. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र मानले जाते. इंग्रजी सत्ताकाळात समाजात प्रबोधन, शिक्षण, विज्ञाननिष्ठ विचार, सामाजिक सुधारणांचा प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले.


बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकार नव्हते, तर ते एक विचारवंत, शिक्षक, इतिहासकार आणि समाजसुधारक होते. त्यांनी पत्रकारितेला केवळ राजकीय घडामोडीपुरती मर्यादित न ठेवता समाजाच्या सर्वांगीण विकासाचे साधन बनवले. सत्य, विवेक, निर्भीड मांडणी आणि लोकजागृती हीच पत्रकारितेची खरी ओळख असल्याचे त्यांनी आपल्या लेखनातून सातत्याने अधोरेखित केले. आजच्या डिजिटल युगातही त्यांच्या मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आदर्श पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


ज्येष्ठांनी दिला मार्गदर्शनाचा मंत्र
कार्यक्रमात बोलताना अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख म्हणाले की, पत्रकारांनी उथळपणा दूर ठेवून वास्तव लेखन करावे. पत्रकाराने सातत्याने सत्यशोधकाची भूमिका बजावली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्राबल्य वाढले असले तरी आजही सर्वसामान्य माणसाचा मुद्रित माध्यमांवरील विश्वास अबाधित आहे. माध्यमांचे स्वरूप बदलले असले तरी पत्रकारांनी विश्वासार्हता जपणे ही काळाची गरज आहे.


माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही दर्पण दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा देत समाजघडणीत पत्रकारितेचे महत्व अधोरेखित केले. ज्येष्ठ पत्रकार लियाकत अली खान यासेर, अच्युत मोरे यांनीही पत्रकारांना मार्गदर्शन केले.


ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, विनायक दहातोंडे, रमेश खोत, लियाकत अली खान यासेर, अहमद नूर, अभयकुमार यादव, बद्री उपरे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, राजेंद्र घुले, विलास खानापुरे, ओमप्रकाश शिंदे, रमेश बोबडे, आयेशा खान मुलानी, शिवकुमार भारुका, अंकुश गायकवाड आदींचा सप्तनीक सहपरिवार सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील दीडशेवर पत्रकार, जाहीरात प्रतिनिधी यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


प्रेस कॉन्सीलच्यावतीने शहरात पेपर वाटप करणार्‍या मनोज गरदास व ज्ञानेश्‍वर बुरला या दोन मुलांना सायकल भेट देण्यात आली.
दरम्यान, कार्यक्रमात संपादक बाबासाहेब आटोळे यांच्या ‘दैनिक त्रिकाल संघर्ष’ या वृत्तपत्राचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांनी नव्या वृत्तपत्रास शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष रसाळ यांनी केले. प्रस्ताविक विधिमंडळ व मंत्रालय संपादक पत्रकार संघाचे प्रदेश सचिव भरत मानकर यांनी केले. प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी आभार मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्पण सकाळचे आमेर खान, शेख चाँद पी.जे., विष्णु कदम, बाबासाहेब आटोळे, सुहास वैद्य, शेख अशफाक, बाबासाहेब कोलते, सुनील भारती, आशिष तिवारी, माणिक जैस्वाल, दिनेश नंद, सय्यद सलमान, सुनील नरवडे, निकिता काळे, शेख महेजबीन आदींनी परिश्रम घेतले.

Post Views: 24
Previous Post

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार – आ.डॉ.बाबासाहेब देशमुख

Next Post

ड्रेनेज व पर्जन्य जलवाहिनी वेगळी ठेवण्याचे आयुक्तांचे निर्देश 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ड्रेनेज व पर्जन्य जलवाहिनी वेगळी ठेवण्याचे आयुक्तांचे निर्देश 

ताज्या बातम्या

पंढरीत चिमुकलीने केला रोजाचा उपवास 

February 26, 2026

एन.एम.एम.एस. स्पर्धेत विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचे यश

February 26, 2026

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू.इंग्लिश स्कूलने मिळविले घवघवीत यश

February 26, 2026

मंगळवेढा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत विविध कामांना मंजुरी 

February 26, 2026

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रवीण भांगे प्रथम क्रमांक

February 26, 2026

कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने अभिनेते अंकुश आतकर सन्मानित

February 26, 2026

घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपास सुरुवात

February 26, 2026

दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये “सुंदर मला व्हायचंय” या विषयावर विशेष सेमिनार संपन्न

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0705153

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697