Friday, April 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

व्रतस्थ पत्रकार म्हणजे सामाजिक मूल्यांचा राखणदार

तरुण भारतbyतरुण भारत
April 10, 2026
in editor
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पत्रकारितेच्या स्थित्यंतराच्या काळात अनेक बदल होत असले तरी पत्रकारितेचा गाभा तोच राहणार आहे. वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचे व्रत घेतलेला व्रतस्थ पत्रकार म्हणजे सामाजिक मूल्यांचा राखणदार असतो, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे) येथील विद्यमान अधिष्ठाता आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे) येथील संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. उज्वला बर्वे यांनी केले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे देण्यात येणारा कल्पतरुकार कै. ल. गो. काकडे स्मृति पुरस्कार गुरुवारी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे यांना डॉ. बर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रविंद्र चिंचोलकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये, सहकार्यवाह प्रा. किरण कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह प्रमोद जोशी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, महिला शाखेच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक शाखेचे अध्यक्ष सुशांत कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे यांना सन्मानचिन्ह, शाल, नॅपकिन बुके आणि पाच हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर डॉ. उज्वला बर्वे यांचे ‘ पत्रकारिता – कालची, आजची आणि उद्याची’ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. बर्वे म्हणाल्या, पत्रकारिता हे क्षेत्रच जनतेच्या हिताकरिता आहे. राष्ट्रउभारणीच्या काळात पत्रकारितेचे योगदान मोठे आहे. १९९१, २००० सालानंतर पत्रकारितेला वेगळे आयाम मिळाले. वसा, व्यवसाय आणि व्यापार असे वेगवेगळे तीन टप्पे पत्रकारितेत दिसून येतात. भारतात वाढलेल्या साक्षरतेमुळे वाचकांची संख्याही मोठ्या संख्येने वाढली आहे. सगळ्यात आधी बातमी देण्याच्या स्पर्धेमुळे पत्रकारिता क्षेत्रात चुरस वाढली आहे. परंतु अशावेळीदेखील आशयनिर्मिती करणाऱ्यांनी समाजहिताचे भान राखून बातम्या दिल्या पाहिजेत. समाजसेवा आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांची सांगड घालून पत्रकारिता करणे ही आजच्या पत्रकारितेची जणू अपरिहार्यता बनली आहे, असेही अधिष्ठाता डॉ. उज्वला बर्वे यांनी सांगितले.

याप्रसंगी ‘राजकारण व पत्रकारिता’ या विषयावरील ग्रंथलेखनाबद्दल रवींद्र चिंचोलकर यांचा विशेष सन्मान  करण्यात आला. पुरस्कारप्राप्त विजयकुमार देशपांडे म्हणाले, पत्रकारितेची आयुधे बदलत असली तरी पत्रकारितेचा मूळ आशय आणि उद्दिष्ट तेच आहे. पत्रकारितेसमोर दररोज वेगवेगळी आव्हाने येत आहेत. सोशल मीडियाच्या काळात घडलेल्या घटनेचे तटस्थ विश्लेषण करून बातमीदारी करण्याची सध्या आवश्यकता आहे, असेही श्री. देशपांडे याप्रसंगी म्हणाले.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक

संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी प्रास्ताविक केले. युवा अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा तर सहकार्यवाह प्रा. किरण कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय करून दिला. तसेच उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये यांनी पुरस्कारप्राप्त विजयकुमार देशपांडे यांचा परिचय करून दिला. कार्यवाह श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, युवा अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, सहकार्यवाह प्रा. किरण कुलकर्णी, महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर,सल्लागार अॅड. अनिल काकडे, मंगला चिंचोळकर,.संजय कुलकर्णी..आदी उपस्थित होते.

————–

वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज

वर्तमानपत्र हे जगातील एकमेव उत्पादन असे आहे की जे उत्पादन किमतीपेक्षा कमी किमतीला विकले जाते. वाचकांना कमीत कमी रकमेत जास्तीत जास्त चांगला मजकूर देण्याचा वर्तमानपत्रांचा प्रयत्न असतो. त्यामुळे जाहिरातीशिवाय वर्तमानपत्र चालू आणि जगू शकत नाही हे वास्तव वाचकांनी समजून घेण्याची गरज आहे, असेही डॉ. उज्वला बर्वे याप्रसंगी म्हणाल्या.

Post Views: 11
Previous Post

अंबाबाईचे दर्शन घेऊन रुजू झाले कोल्हापूरचे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड

Next Post

चोपडी वनविभागातील १८ हजार झाडांना पाणी घालण्यास सुरुवात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
चोपडी वनविभागातील १८ हजार झाडांना पाणी घालण्यास सुरुवात

चोपडी वनविभागातील १८ हजार झाडांना पाणी घालण्यास सुरुवात

ताज्या बातम्या

संतांनी भक्तीभाव निर्माण केला > आरती काळे

संतांनी भक्तीभाव निर्माण केला > आरती काळे

April 10, 2026
विश्वरत्न चषक बुद्धिबळ स्पर्धा

विश्वरत्न चषक बुद्धिबळ स्पर्धा

April 10, 2026
अखेर सोलापूर विजयपूर महामार्गावरील काटेरी झाडे काढली

अखेर सोलापूर विजयपूर महामार्गावरील काटेरी झाडे काढली

April 10, 2026
मोडनिंब येथील महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात सकारात्मक तोडगा

मोडनिंब येथील महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात सकारात्मक तोडगा

April 10, 2026
सिद्धेश्वर एक्सप्रेस ५० वर्ष : सोलापूरात जल्लोषात सुवर्णमहोत्सव साजरा

सिद्धेश्वर एक्सप्रेस ५० वर्ष : सोलापूरात जल्लोषात सुवर्णमहोत्सव साजरा

April 10, 2026
अवैध गौण खनिज कार्यवाहीत 6 हायवा व 1 पोकलँड जप्त

अवैध गौण खनिज कार्यवाहीत 6 हायवा व 1 पोकलँड जप्त

April 10, 2026
नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेने माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानची स्थापना- डॉ.संजीवनी केळकर

नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेने माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानची स्थापना- डॉ.संजीवनी केळकर

April 10, 2026
महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर कार्यवाही करावी 

महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर कार्यवाही करावी 

April 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0797563

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697