*बँकांनी कर्जाची टाळाटाळ न करता लाभार्थ्याला सन्मानपूर्वक वागणूक द्यावी आणि पंधरा ते वीस दिवसात कर्ज प्रकरण निकाली काढावे-* मा. नरेंद्र पाटील
*जाफराबाद तहसील कार्यालयात कर्ज आढावा बैठक*
जाफराबाद/ प्रतिनिधी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या तळागाळातील लाभार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून तालुकास्तरावर दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात
येत आहे. मराठा तरूणांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांची गय केली जाणार आहे, असा इशारा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिला. जाफराबाद तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की,
विविध बँकाच्या किचकट नियमावलीमुळे अनेक मराठा तरुण या योजनांपासून वंचित आहेत. बँक तथा लाभार्थ्यांनी एकमेंकाचे हित जपून तथा समन्वयातून आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कर्ज प्रकरणे मार्गी लावावी, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
जाफ्राबाद येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि.२६) रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार डॉ. सारीका भगत, नायब तहसीलदार आर. एम. निहाळ विजयसिंह परीहार, विभागीय समन्वयक प्रवीण पाटील, उध्दव दुनगहू, डी. एल. भूते, ए. के. टाकरस,एस.व्ही.वाघ, स्वप्निल देवकाते, उमेश कोल्हे, वेदांत खैरे, सोमेश्वर शिंदे, अविनाश देवकर, कृष्णा फुलमाळी, पंढरी परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पूर्तता करून बँकेकडे प्रस्ताव – दाखल करावा. यासाठी बँकानी कर्ज देण्यास टाळाटाळ न करता त्यांना – सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. १५ ते * २० दिवसात सदरील कर्ज प्रकरणे – निकाली काढावे, अशा सूचना – पाटील यांनी यावेळी दिल्या. तर – बँक आणि लाभार्थ्यांनीही कोणत्या – व्यवसायासाठी किती कर्ज घ्यायचे – आहे व बैंक किती देणार आहे याचा – अभ्यास करुन कर्ज प्रकरणे करावी. –
मागील काही वर्षाचा आढावा बघता – बँकाकडे अनेक प्रकरणे प्रलंबित – असून, तालुक्यात गेल्या काहीमहिन्यांत बँकांनी १ हजार १४५ प्रकरणे करण्याचे अपेक्षित होते. मात्र यापैकी निम्मेही कर्ज प्रकरणे निकाली निघाले नसल्याने बँकांनी नेमक्या कोणत्या कारणाने ही कर्ज प्रकरणे निकाली काढल्या गेले नाही असा सवालही त्यांनी विविध बँकाच्या व्यस्था पकांना विचारला. पुढील काळात प्रलंबित तथा नव्या येणाऱ्या कर्ज प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा अशा सूचनाही त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना दिल्या. दरवर्षी किमान ५०० लाभार्थ्यांना तरी या महामंडळातील विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी बँकांनी तत्परतेने काम करावे असे अवाहनही त्यांनी केले.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र, चिखली अर्बन, श्री. गजानन महाराज अर्बन, महाराष्ट्र ग्रामीण,एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा,जिल्हा मध्यवर्ती यासह तालुक्यातील विविध बँकाचे व्यावस्थापक तथा कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने
उपस्थिती होती. यावेळी मराठा समाजातील लाभार्थी, बँक व इतर कर्मचारी तथा नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.