तभा वृत्तसेवा टेंभुर्णी / प्रतिनिधी
माणसाचा प्रगतीचा आलेख नक्कीच यशस्वी पुरुष सारखा पाहिजे,तेच यश टेंभुर्णीच्या डॉ गणेश चंदनशिवे यांनी अंगीकारले असे दिसते.यांना भेटणाऱ्या पुरस्काराचे क्रम हा चालूच आहे. दिनांक 8/7/2024. रोजी मुंबई येथे टेंभुर्णी येथील भूमिपुत्र असलेले डॉ.प्राध्यापक श्री गणेश चंदनशिवे यांना प्रतिष्ठेचा समजल्या जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर झाला असून तो पुरस्कार आपल्या राज्याचे राज्यपाल महामही श्री रमेशजी बैस यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
पिपल्स एजयुकेशन सोसायटी च्या ७९ व्या अमृत महोत्सवा औचित्य साधून मा.महामहीम महारष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते व देशाचे सामाजीक न्याय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब ,पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात ,पद्मश्री ऍड. उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आज लोकलेच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल माझा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
ज्यांनी जोखीम पत्करली, महासागरांवर वर्चस्व निर्माण केले आणि उद्योजक आणि व्यवसाय करण्यासाठी देश आणि खंड पार केले, त्यांनी जगावर राज्य केले. भारत अनेक शतकांपासून सागरी राष्ट्र होते. जगातील अनेक दूरवरच्या देशांशी भारताचे व्यापारी संबंध होते. देशाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य शिक्षण आणि उद्यमशीलतेला प्राधान्य द्यावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.
दलितांच्या उन्नतीसाठी शिक्षण हे एकमात्र प्रभावी माध्यम आहे. केवळ शिक्षणाद्वारे पीडित भारतीय जनतेला त्यांच्या मानव म्हणून असलेल्या अधिकारांची जाणीव करून दिली जाऊ शकते, असे डॉ. आंबेडकरांचे ठाम मत होते, असे राज्यपालांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज मुंबई, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, बंगलोर आणि बिहारमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे चालविली जात असून एकूण दीड लाख विद्यार्थी विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत आज जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणून उदयास आले आहे. जगातील अनेक देश, विशेषत: वृद्ध देश त्यांच्या कुशल मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. या दृष्टीने पीपल्स एज्युकेशन सोसायटीने उच्च शिक्षणाला कौशल्य शिक्षणाची जोड द्यावी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे असे राज्यपालांनी सांगितले. या वेळी उपस्थित सर्व मान्यवर यांनी आप आपली यथोचित मनोगत मांडले आणि ज्यांना हे पुरस्कार भेटले त्यांचे अभिनंदन केले. टेंभुर्णीच्या भूमिपुत्राला भेटलेल्या पुरस्कार बद्दल येथील भरपूर जणांनी त्यांना फोन करून मेसेज करून त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.