अक्कलकोट – दिवाळी संपली तरी अनेक शेतकऱ्यांचा खात्यावर अतिवृष्टीचे एक दमडीही पैसा बँक खात्यावर जमा झाले नाहीत. सरकाराच्या जीवावर दिवाळी सण साजरा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अक्षरशः काळी दिवाळी साजरी करावी लागली. अनेक शेतकरी उदारीने दिवाळी करण्यासाठी धडपड केले. मात्र बाजारातून त्यांना उदार कोणही दिले नाही. अतिवृष्टी पावसाने जोरदार झोडपल्याने आणि सरकारने फसविल्याने अनेक शेतकऱ्यांना अक्षरशः काळी दिवाळी साजरी करावी लागली.
दसरा ते दिवाळी दरम्यान पावसाने विश्रांती घेतली.परंतु दिवाळी संपताच पुन्हा पाऊस सुरु झाल्याने रब्बी पेरणी पण रखडले आहे.यामुळे शेतकऱ्यांची अर्थचक्राचा आर्थिक कणा मोडला आहे. मदतीच्या पोकळ घोषणाबाजीने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दिवाळी सण संपली असताना अतिवृष्टीचे पाच पैसेही अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. दिवाळी सण गोडवा करण्यासाठी शेतकऱ्यांचा बँक खात्यावर दिवाळीपूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचे सरकारने आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात एक दमडीही मिळाले नाही. यामुळे दिवाळी सणात बाळगोपाळांना दोन गोड घास भरवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना बाजारातून कोणीही उदार दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.
अतिवृष्टी पावसामुळे हात उसने कर्ज बाजरी करून जोपासलेले पिके मातीमोल झाली, पिकांसह शेतीही वाहून गेली, सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या खरीपची पिके महत्वाची असतात, त्यावरच त्याचे वर्षभर प्रपंच चालते. यंदा पिके बहरली असतांनाच अचानक अस्मानी संकट कोसळले. होत्याचे नव्हते झाले.शासकीय पातळीवरून मदतीची मोठी घोषणाही करण्यात आली. दिवाळीच्या आत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे सरकारने आश्वासन दिल्याने लवकरच मदत मिळेल, असा आशेचा किरण मनात ठेऊन बसलेला शेतकरी निराशेच्या अंधारात बुडाला आहे. शेतात पिकेच नसल्याने कोणताही व्यापारी उधारीवर व्यवहार करायला तयार नाही. बँकांची कोणत्याही कर्जाला नकार घंटा आहे.खर्चासाठीही त्यांची ओढाताण सुरू असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दीपावली सण अंधारात गेली आहे. दसरा ते दिवाळी दरम्यान पावसाने उघड दिले होते. मात्र दिवाळी संपताच पुन्हा पाऊस सुरु झाल्याने रब्बी पेरणी पण रखडले आहे.यामुळे शेतकऱ्यांची अर्थचक्राचा आर्थिक कणा मोडला आहे. मदतीच्या पोकळ घोषणाबाजीने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
मे महिन्यात जोरधार पाऊस कोसळल्यानंतर जमिनीवर उभ्या असलेल्या उसाला महागडे खते टाकून बांधणी केली, जून-जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडत गेल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पेरणी केली. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी पावसाने सारे धुऊन गेले. मे महिन्यापासून केलेला सगळे खर्च वाहून गेला आहे. दिवाळी संपताच पुन्हा पाऊस सुरु झाल्याने रब्बी पेरणी पण रखडले आहे.यामुळे रब्बीचीही पिके येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रासाठी मदतीच्या रकमेत शासनानी वाढ करावी अशी मागणी होत आहे.




















