श्रीपूर – नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामा मध्ये कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात गाळपास आलेल्या उसाची बिले प्रति मे.टन रक्कम रु. 3,000/- प्रमाणे अदा केली असून कामगारांनाही शासनाच्या वेतनवाढ कराराप्रमाणे 10% पगारवाढ देवून “शेतकरी हिताय कामगार सुखाय” हा श्रध्देय सुधाकरपंत परिचारक यांचा मुलमंत्र जपला गेला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे सर, संचालक व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते. पुढे बोलतान ते म्हणाले की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने जाहीर केलेली ऊस बिलाची प्रति मे.टन रक्कम ३००० / – प्रमाणे एकुण रक्कम रु. २८२ कोटी शेतकऱ्यांना अदा केली असून ऊस उत्पादकांची संपुर्ण ऊस बिलाची एफ.आर.पी.पेक्षा जास्तीची रक्कम देणारा जिल्हातील पहिला कारखाना ठरला आहे. त्याचप्रमाणे कामगारांनाही शासनाच्या वेतनवाढ कराराप्रमाणे 10 % पगारवाढीची रक्कमही डिसेंबर २०२५ पासूनच लागू केली आहे.
तर कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी अचुक नियोजना मुळे कारखाना व्यवस्थित चालले मुळे विनाखंड गाळप झाल्याने दैनदिन गाळपातील उच्चांक निर्माण करत १०२ दिवसात ९ लाख ४० हजार २२२ मे.टन ऊसाचे गाळप करून सरासरी ११ % साखर उताऱ्याने ८ लाख ५२ हजार ७९० क्विं.साखर उत्पादन झाले आहे . कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पामधूनही आजपर्यत ६ कोटी इतके युनिट वीज निर्मिती करून ३.०४ कोटी युनिट महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळास विक्री केली आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या असावनी प्रकल्पामधूनही १.१० कोटी लिटर उत्पादन घेतले असून अद्यापही हे दोन्हीही प्रकल्प चालू आहेत. कारखान्याकडे गळीत हंगाम 2025-26 मध्ये ऊस तोडणी वाहतूक करण्यासाठी आलेल्या तोडणी वाहतूक ठेकेदारांची बिले ही वेळेवर दिली आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी तीन हजार रु . मिळालेला भाव व कामगारांना मिळालेली १०% पगार वाढ या मुळे समाधान व्यक्त होत आहे . कारखान्याची रु. २८५३ रु एफ.आर.पी असतानाही १४७ रु . जास्तीची रक्कम दिली आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम सुदाम मोरे विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव उपस्थित होते .

























