कुर्डूवाडी – गोरक्षकांच्यादक्षतेमुळे कतली साठी डांबून ठेवलेल्या ३४गोवंशाची सुटका झाली आहे .याबाबत माहिती अशी गोरक्षक सुभाष चिमकर रा हडपसर ,पुणे तथा प्राणी कल्याण अधिकारी यशवंत शंकर सुर्वे यांनी कुर्डूवाडी पोलिसांना मौजे शिराळ मा. ता. माढा हद्दीत अवैद्य कतली करता देशीगोवंश जातीचे जनावरे निर्दयीने दोरीने बांधून विना चारा पाण्याने ठेवली असल्याचीमाहिती दिली.
पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. लिमकर, पो.हे.काँ.भोसले पो.काँ. सरडे पो.काँ. ताकभाते असे सर्वजण सरकारी वाहनाने रात्री दि .१७ रोजीरात्री११:३० वाजण्याच्या सुमारास मौजे शिराळा मा. गावाच्या हद्दीतील एका शेताशेजारी काटेरी झुडपामध्ये ११ जर्सी गायी ७पांढऱ्या खिलार गायी, ३ गावरान गायी, १देशी खिलार कालवड ,६ देशी खिलार खोंड ,१गावरान कालवड, ४देशी गिरकालवड, १ देशी गिर खोंड अशी एकूण ३४ गोवंश दाबून पायांनादोरीने बांधून ठेवलेली दिसले त्यांना फिरता देखील येत नव्हते अशा दाटीवाटीनेनिर्दयपणे दाबून ठेवलेले होते. त्यांना चाऱ्याची व पाण्याची कोणतीही प्रकारची सोयकेलेली नव्हती.
सदर ठिकाणी आजूबाजूला चौकशी केली असता सदर जनावरे हे संशयित आरोपी यल्लापा अंबू वाघमोडे रा. शिराळ ता. माढा जि.याचीअसल्याची माहिती असल्याचे समजले . सदर जनावर सुरक्षितेसाठी पोलिसांनी दोन आयशरटेम्पो गाडी बोलवून घेऊन सदरची जनावरे श्रीकृष्ण गोशाळा ,बैरागवाडी येथे जमा करण्याकामी दिली. प्रकरणी हरिश्चंद्रमारुती चाकणे (वय ३२ ) रा.नोकरी नेमणूक कुर्डूवाडी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिलीआहे.




















