मोडनिंब – भारतीय जनता पार्टी माढा तालुका यांचे वतीने राष्ट्रीय किसान दिवसाच्या निमित्ताने मोडनिंब (ता.माढा) येथे शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांना मानाचा फेटा, शाल, हार, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगताना भारतीय जनता पार्टीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी शेतकऱ्यांना बोलताना व्यक्त केला.त्यानंतर शेती क्षेत्रामध्ये विक्रमी उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी विचार मांडले. १९७८ पासुन द्राक्षे मध्ये विक्रमी उत्पादन घेणारे कषीभुषण देविदास मोरे यांनी विचार व्यक्त केले. डाळिंब उत्पादक शेतकरी माने यांनी डाळिंब पिकाविषयी मागदर्शन केले.
यामध्ये तुर, केळी ,द्राक्षे, डाळिंब, बोर, कांदा, ऊस इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास कृषीतज्ञ मनोज शहा, प्राध्यापक प्रशांत कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किसान मोर्चाचे नंदकुमार मोरे यांनी आपल्या मनोगतात दोन तीन वर्षीतुन महाराष्ट्र शासनातर्फे कृषी भूषण व इतर पुरस्कार शेतकर्यांना देण्यात येतात. प्रत्येक वर्षी पुरस्काराने शेतकऱ्यांना सन्मानित करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
तसेच हे राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अपघात विमा योजने मार्फत शेतकऱ्यांना मदत केली जाते. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी माढा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, राज्य परिषद सदस्य दत्तात्रय जाधव, सरचिटणीस धनाजी लादे, किसान मोर्चाचे नंदकुमार मोरे, रविकांत जाधव ॲड. गणेश सुर्वे, विवेक कुंमभेकर, शहाजी यादव, प्रताप व्यवहारे, सतीश लोंढे, पांडुरंग राऊत, नावजी अनभुले, शहाजी भांगे, आप्पासाहेब झाडबुके, पितांबर लेंढवे, अमोल काटकर, सावता वाघमारे, सचिन शिंदे, रोहन शिंदे तसेच तालुक्यातील विविध पिकांमधील प्रगतशील शेतकरी, भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















