नायगाव / नांदेड – राज्यात सध्या सर्वत्र थंडीचा कडाका जाणवत असताना, नायगांव तालुक्यां मध्ये मात्र या गुलाबी थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना,विशेषतः हरभऱ्या ला, मोठा फायदा होताना दिसत आहे. निसर्गाचा हा ‘वरदहस्त’ मिळाल्याने नायगांव आणि नरसीसह परिसरातील गावची शिवारे रब्बी हंगामातील पिका ने हिरवेगार झाले असून, शेतकऱ्यां च्या मनाला रब्बी हंगामातील सुगीचे भावनिक संकेत मिळत आहेत.
वातावरणातील सुखद गारव्यामुळे हरभरा पिकाची वाढ अपेक्षेपेक्षा उत्तम झाली आहे. पिकांवर कुठेही रोगराईचा प्रादुर्भाव दिसत नसून, केवळ निरोगी वाढच नव्हे, तर सध्या फुलोरा धरण्याची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.शेताच्या बांधा वरून जाताना हरभरा डोलणारे हिरवे पीक पाहणा ऱ्यांच्या मनाला एक वेगळी च शांतता, समाधानाचा स्पर्श करून जात आहे.
सध्याचे हवामान यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा पिकांसाठी अत्यंत पोषक असल्याचे तालुक्यातील येथील कृषी तज्ज्ञांचे मत आहे.थंडीमुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो, ज्यामुळे पिकाला आवश्यक पाणी सहज उपलब्ध होते.तसेच,संतुलित तापमान फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर होण्यास मदत करते.
या अनुकूल परिस्थितीमुळे नायगांव तालुक्यातील नरसी सह ,होटाळा,कांडाळा, धानोरा, मरवाळी तांडा मूगांव सहा अन्य गावातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान पसरलेले दिसत आहे. जर हेच पोषक हवामान असेच कायम राहिले, तर या वर्षी हरभऱ्याचे विक्रमी आणि भरघोस उत्पादन मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. निसर्गाच्या याकृपेमुळे शेतकऱ्यां च्या आर्थिक स्थिती त सुधारणा होण्याची आशा पल्लवित झाली असून, संपूर्ण नायगांव तालुक्यातील शेतकरी वर्गात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.


















