Monday, August 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नालंदा विद्यापीठाचा विध्वंसक : बख्तियार खिल्जीच

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 28, 2024
in top news
0
नालंदा विद्यापीठाचा विध्वंसक : बख्तियार खिल्जीच

Oplus_0

0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महंमद इब्न बख्तियार खिल्जी या नराधमाने हिंदुस्थानातील अनेक विद्याकेंद्र, मंदिरे, मठ, वेदविद्यालये, विद्यापीठे शोधून काढली आणि ती बेचिराख करण्याचा सपाटा लावला. कोणी काहीही म्हणोत पण नालंदाचे जगप्रसिद्ध विश्वविद्यालय याच बख्तियार खिल्जीने जाळून टाकले. या नराधमाने आपली विश्वविद्यालये आणि मंदिरे, मठ नष्ट केली आणि त्याच्या नावाने आज बिहारमध्ये पाटणा जिल्ह्यात एक छोटे शहर आहे. त्या शहराचे नाव बख्तियारपूर आहे. हे शहर बिहारच्या मध्यभागात पाटण्याच्या चाळीस किलोमीटर पूर्वेला वसलेले असून ते एक रेल्वे स्थानकही आहे.

आपल्या बांधवांच्या रक्ताने ज्याचे हात माखलेले आहेत आणि ज्याने इथली शारदेची मंदिरे, विद्येची मंदिरे नष्ट केली त्या नराधमाचे नाव आपण आपल्या देशातील शहरांना देऊन त्यांच्या विषयीचा आदरभाव व्यक्त करतो आहोत, याची लाज वाटते. कारण यात गुलामगिरी मानसिकता विशेषत्वाने आढळते.

बख्तियार खिल्जी भारतात राहून लूटमार करणाऱ्या एका इस्लामिक टोळीचा सभासद होता. तो जेव्हा बदायून नावाच्या नगरीत पोहचला तेव्हा तेथे हिज्बारउद्दीन हसन नावाचा एक मुसलमान दरोडेखोर होता. त्याने तिथे स्वतःचे बस्तान बसवले होते. त्याला त्याच्या टोळीत उडाणटप्पू आणि क्रूर असा एक नराधम हवा होता. असा नराधम त्याला बख्तियारच्या रूपात मिळाला.

अत्यंत अल्पकाळात खिल्जीने सहमत आणि सहली नावाच्या दोन गावांवर दहशत निर्माण करून ती स्वतःच्या कह्यात घेतली आणि तिथे स्वतःची जहागिरी म्हणून घोषित केली. दरोडेखोरी आणि अत्याचार या कुकर्मात त्याने स्वतःचे कौशल्य वाढवले होते.

ब्राह्मणांनी नालंदा जाळले: एक काल्पनिक कथा

खिल्जीच्या सुमारे चारशे वर्षानंतर तारानाथ नावाचा एक लामा होऊन गेला. त्याने हिस्टरी ऑफ बुद्धिझम इन इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने एक कथा लिहिली त्या कथेनुसार नालेंद्र नावाच्या एका राजाने मंदिर बांधले. ते तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जात होते. या तीर्थक्षेत्री दोन भिकारी यात्रेकरूच्या वेशात भीक मागण्यासाठी आले. त्यांची बौद्ध भिक्षुकांशी काही वादावादी झाली. बौद्ध भिक्षुकांकडून त्यांचा अपमानही झाला. पण त्या दोन भिकाऱ्यांपैकी एक भिकारी भिक्षा मागण्यासाठी तिथून दुसरीकडे निघून गेला. दुसरा यात्रेकरू मात्र अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी तिथेच राहिला. त्याने त्या एका भागात जमीन खणून एक खड्डा केला. त्या खड्ड्यात बसून त्याने नऊ वर्षे सूर्यसाधना केली. पण या नऊ वर्षांच्या साधनेने त्याला अपेक्षित असलेली सिद्धी प्राप्त झाले नाही. म्हणून तो त्या खड्ड्यातून बाहेर आला. तो बाहेर येताच एकाने त्याला अडवले आणि सांगितले जोपर्यंत तू सिद्धी प्राप्त करत नाहीस तोपर्यंत त्या खड्ड्यातच राहा आणि साधना कर. सिद्धी प्राप्त न करताच खड्ड्यातून बाहेर आला तर मी तुझा शिरच्छेद करीन. या धमकीला बळी पडून तो यात्रेकरू खड्ड्यात बसून पुन्हा सूर्य साधना करू लागला सुमारे तीन ते चार वर्षानंतर तो त्या खड्ड्यातून बाहेर आला तेव्हा त्याला सिद्धी प्राप्त झाली होती. सूर्य साधनेमुळे त्याच्यात तेज निर्माण झाले त्या तेजामुळे नालंदा विद्यापीठ जळून गेले. अशा प्रकारे त्या ब्राह्मणानेच नालंदा विद्यापीठ जाळले त्यात ८४ मंदिरे भस्मसात झाली.

या काल्पनिक कथेचा आधार घेऊन नालंदा ब्राह्मणांनी जाळली अशी आरडा ओरड सध्या चालू आहे.

नालंदा जाळणारा खिल्जी : ऐतिहासिक दाखले

वरील कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे हे सिद्ध करणारे अनेक ग्रंथ आज उपलब्ध आहेत.

खिलजीच्या समकालीन असणारा मौलाना मिन्हाजउद्दीन याची बखर तबकात-इ-नासरी आपल्याला सांगते की खिल्जीने नालंदा विद्यापीठ जाळले. तो २०० घोडेस्वारांना घेऊन आला होता. त्याने नालंदावर आक्रमण केले. तिथल्या स्थानिक ब्राह्मणांचा शिरच्छेद केला.

खिल्जीच्या वाढत्या दराऱ्याची अधिकाराची आणि कसबाची वार्ता दिल्लीत अधिकार गाजवणाऱ्या कुतुबुद्दीन ऐबक यांच्या कानावर पोहोचली. स्वतःच्या इस्लामी हैदोसाने हिंदुत्वाचा विध्वंस करू शकणारा एक नवीन मुसलमान गुंड तयार झाल्याचे ऐकून कुटुबुद्दीन ऐबकला त्याचा अभिमान वाटला. त्याच्या या कुकृत्याबद्दल कुतुबुद्धीने खिल्जीला मानाचा पोशाख, दागिने रोख रक्कम देऊन गौरवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र वाङ्मय उपलब्ध आहे. या वाङ्मयातील सातव्या खंडात नालंदा विद्यापीठ संबंधी जी माहिती मिळते ती अशी..

“मुसलमान आक्रमकांनी ज्या विश्वविद्यालयांची लूट केली त्या पैकी नालंदा, विक्रमशीला, जगदल औदंतपुरी इथल्या विश्वविद्यालयांचा समावेश होतो. त्यांनी बौद्ध मठांचा विध्वंस केला. तिथले सहस्रावधी भिक्षुक घाबरून पळून गेले आणि त्यांनी नेपाळ,तिबेट इथे वास्तव्य केले. मुसलमानांनी सहस्रावधी भिक्षूंची हत्या केली.”

फ्रेडरिक एम आशेर, जे एन यु चे प्राध्यापक वीरेंद्रनाथ प्रसाद, अमेरिकन इतिहासकार आणि तत्वज्ञानी विल डुरंट, अमर्त्य सेन, अरुण शौरी, पु.ना.ओक या आणि अशा अनेक लेखकांनी नालंदा विश्वविद्यालय बख्तियार खिल्जीने जाळल्याचे त्यांच्या ग्रंथातून साधार सिद्ध केले आहे.

खिल्जीच्या वाढत्या उन्मादाला रोखण्यासाठी पुढे सरसावला तो आसामचा हिंदूराया. त्याने खिल्जीचे कंबरडे मोडले. पण खिल्जी त्याच्या तावडीतून सुटला. अखेरीस त्याला त्याच्याच सैनिकाने भोसकून ठार मारले. अनेकांचा कर्दनकाळ ठरलेला हा नराधम गझनीपासून लांब दुसऱ्या टोकाला असलेल्या देवकोट येथे मारला गेला.

या इतिहासाकडे डोळे झाक करून जाणीवपूर्वक हिंदूंमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याच्या हेतूने नालंदा विद्यापीठ खिल्जीने जाळले नसून ब्राह्मणांनी जाळले असा अपप्रचार केला जातो.

यामागे देशात आराजक निर्माण व्हावे हाच हेतू आहे. असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. इतिहासाचे विकृतीकरण करून देशात यादवी वाजवण्याचा प्रयत्न करणे हा राष्ट्रद्रोह आता सहन करणे म्हणजे आपणच आपला घात करण्यासारखा आहे. याला पाय बंद घालण्यातच राष्ट्राचे हित आहे.

– दुर्गेश जयवंत परुळकर

Post Views: 51
Previous Post

भंडाऱ्यात भरधाव व्हॅनची कारला धडक; तिघे गंभीर जखमी

Next Post

मुरलिकांत पेटकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुरलिकांत पेटकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुरलिकांत पेटकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ताज्या बातम्या

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

August 16, 2026
श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

August 16, 2026
नव्या दशकात ‘ग्रीन सिटी’चा संकल्प; दहा वर्षांत ५ हजारांहून अधिक वृक्षारोपण

नव्या दशकात ‘ग्रीन सिटी’चा संकल्प; दहा वर्षांत ५ हजारांहून अधिक वृक्षारोपण

August 16, 2026
कॉपीमुक्तीची शपथ अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; कंदलगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात

कॉपीमुक्तीची शपथ अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; कंदलगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
बाटू’ च्या क्रीडा स्पर्धेस ९ सप्टेंबरपासून सुरुवात

बाटू’ च्या क्रीडा स्पर्धेस ९ सप्टेंबरपासून सुरुवात

August 16, 2026
जागृती विद्या मंदिर प्रशालेत  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जागृती विद्या मंदिर प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
ग्रीन कॅम्पस उपक्रमासह विद्यार्थी, शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी बस सेवेचा शुभारंभ

ग्रीन कॅम्पस उपक्रमासह विद्यार्थी, शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी बस सेवेचा शुभारंभ

August 16, 2026
छत्रपती शिवाजी संकुलात स्वातंत्र्यदिनी बालक मंदिर विभागाचे उद्घाटन

छत्रपती शिवाजी संकुलात स्वातंत्र्यदिनी बालक मंदिर विभागाचे उद्घाटन

August 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1075965

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!