गेवराई येथील हरवलेल्या तीन मुली यांना वाटुर ग्रामस्थांच्या सहकार्याने मुलींना सुखरूप पहोचवले (मोहसिन पटेल) (मोहम्मद पटेल)
वाटुर प्रतिनिधी.. अयाज पठाण
वाटुर येथील समाज कार्य करणाऱ्या लोकांच्या मदतीने या तिन्ही मुलींना आपल्या घरी रात्री दोन वाजता नेऊन सोडले
सविस्तर वृत्त असे की दिनांक 14 /7/2024 रोजी गेवराई तालुका जिल्हा बीड येथील तीन मुली सकाळी तिनही सख्या चुलत बहिणी वय वर्ष 8, 9, आणि 10, गेवराई येथून जालना मार्गे मंठा येथे आपल्या वहिनी आणि दाजीला भेटण्यासाठी गेले असता दिवसभर वहिनी आणि दाजी चे झोपडी शोधत फिरले
त्यांना वहिनी ची झोपडीचे ठाव ठिकाणांना न लागतात सायंकाळ झाली तिनी मुली गोसावी समाजातील गावोगावी फिरून फिरस्ती असल्याने आपल्या वहिनीची झोपडी शोधत फिरत होते मात्र संध्याकाळ झाल्याने त्यांना कोठेच झोपडीपाल यांचा शोध न लागल्याने सैरा वैरा सायंकाळी मंठा बस स्थानक समोर रिक्षा स्टँडवर रडताना दिसून आले
दिनांक 14 7 2024 रोजी आकणी येथील ड्रायव्हर रमेश अण्णासाहेब मोरे हे मंठा येथून रात्री साडेसात वाजता वाटूर येथे येत असताना तेथे त्यांना तीन मुली दिसल्या त्यांची चौकशी केली असता त्या गेवराई जिल्हा बीड येथील असल्याचे समजले म्हणून त्यांनी सुरक्षित रित्या त्यांना वाटूर चौकी येथे पोलिस अधिकारी नंदकिशोर खंदारे यांचे समक्ष हजर केले व वाटुर येथील लोकमत पत्रकार अजहर भाई, पुण्य नगरी पत्रकार बाबा भाई, अयाज पठाण दै तरुण भारत पत्रकार यांनी सदर मुलींची चौकशी करून त्या गेवराई येथील असल्याचे खात्री करून घेतली वेळ जास्त झाल्याने त्यांना
त्यांच्या घरी सुखरूप पोहोचणे आवश्यक वाटल्याने वाटुर ग्रामस्थांची चर्चा करून अक्तर भाई शेख यांच्या कार मध्ये सदर मुलींना बसवून त्यांचे पालकांना संपर्क साधून बाबासाहेब यांच्या सहकार्या
ने व महेमुद पटेल ,सरताज शेख, मोहसिन पटेल,जूनेद शेख,अतीक देशमुख इतरांनी सदर मुली ना वाटूर येथून गेवराई येथे त्यांचे पालकांच्या ताब्यात नेऊन सुखरूप दिले त्यामुळे तिन्ही मुलींना हे प्रकारचे नवीन जीवदान मिळालेले आहे चालक पोलीस वाटुर ग्रामस्थ व पत्रकार बंधूंनी केलेल्या अनमोल कामगिरीची वाटुर परिसरात चर्चा होत आहे