Friday, July 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पसमांदा मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 22, 2023
in maharashtra, india
0
पसमांदा मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय जनता पक्षाच्या हैदराबाद येथील फेब्रुवारी 2022 मधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पक्षाने नवीन राजकीय समीकरणे निर्माण करण्याची गरज अधोरेखितकेली होती आणि मुस्लिम समाजातील मागासवर्गीय (पसमांदा) मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करण्यावरभर दिला होता. मोदींच्या या विधानानंतर देशातील माध्यमे आणि राजकीय पक्षांत खळबळ उडाली होती आणि मोदींच्या हेतूंबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. पंतप्रधानांनी या विषयाला हात घातल्यानंतर मुस्लिम समाजात जाती व्यवस्था नसल्याबद्दलच्या, जाणीवपूर्वक पसरवलेल्या गैरसमजाचे निराकरण झाले. मोदींनी उल्लेख केल्यानंतर पहिल्यांदाच पसमांदा मुस्लिम समाजाची राष्ट्रीय मीडिया आणि राजकीय पक्षांना दाखल घ्यावी लागली.

 

पंतप्रधानांनी या विषयाला हात घालण्यापूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, केशव प्रसाद मौर्य यांनी फेब्रुवारी, 2022 च्या विधानसभा निवडणुकींच्या दरम्यान भारतीय मुस्लिम समाजातमागास जाती असल्याचे प्रतिपादन केले होते. उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने मुस्लिमांमधील मागास जातींतील अनेकांना पक्षातील महत्वाच्या पदांवर नियुक्त केले होते. यात पक्षाने आझाद अन्सारी यांना अल्पसंख्यांक कल्याण मंत्री तर अन्सारी आणि सैफी या मागास जातीतील दोघांना पक्षाच्या अल्पसंख्यांक शाखेतमहत्वाच्या पदांवर नियुक्त केले होते. पसमांदा हा शब्द पस आणि मांदा या दोन पर्शिअन शब्दांपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ सामाजिक दृष्ट्या मागास असा होतो. हाशब्द पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या अली अन्वर यांनी पहिल्यांदा बिहार मध्ये वापरला आणि मुस्लिम समाजातील जातीव्यवस्थेवर शिक्कामोर्तब केले. अली अन्वर यांनी सय्यद, शेख, पठाण आणि मुगल हे मुस्लिम समाजातील उच्च वर्गात मोडत असल्याचे आणि अन्य सर्व, ज्यांचा उच्च वर्गात समावेश नाही, ते भारतात सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या उपेक्षित असल्याचे प्रतिपादन केले होते. ह्या वर्गाच्या अवस्थेकरिता मुस्लिमातील अभिजन वर्ग जबाबदार असल्याचे अली अन्वर ह्यांनी प्रतिपादन केले होते. अली अन्वर यांनी पसमांदा मुस्लिमांच्या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचे नंतर ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम मंच असे नामकरण करण्यात आले. यासोबतच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, बॅकवर्ड मुस्लिम मोर्चा आणि द बॅकवर्ड मुस्लिम महासभा अशा इतर संस्था देखील मुस्लिमांमधील उपेक्षित जातींची सामूहिक ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होत्या.

 

इतिहासात डोकावता, भारतातील मुस्लिम समाजाला खालील श्रेणींमध्ये विभागण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळून येते: 1) ब्रिटिश जनगणना मानववंशशास्त्रद्यांनी 1901 च्या बंगालमधील जनगणनेच्या वेळी अधूनमधून अश्रफ आणि अजलफ या संकल्पनांचा वापर केल्याचे आढळून येतो;

2) मोमीन कॉन्फरन्सने अभिजन वर्गाचा उल्लेख शरीफ तर अन्य खालच्या जातींचा उल्लेख राझिल असा केला आहे;

3) गौस अन्सारी नामक अभ्यासकाने 1960 मध्ये मुस्लिम जातींना अश्रफ, मुस्लिम राजपूत, स्वच्छता काम करणाऱ्या जाती आणि अस्पृश्य मुस्लीम अशी 4 श्रेणीत विभागणी केली आहे.

4) सरकारने नेमलेल्या सच्चर कमिटीने आपल्या अहवालात मुस्लिम समाजातील जातींना खालील श्रेणींत विभागले आहे:

 

अ) अश्रफ, जे आपला उगम विदेशात असल्याचा अथवा इस्लाम मध्ये धर्मांतरित झालेल्या हिंदूंमधील उच्च वर्गात असल्याचे मानतात; ब) अजलफ जे हिंदूंमधील मध्यम वर्गातून इस्लाम मध्ये धर्मांतरित झाले आहेत; क) अर्झल, जे हिंदूंमधील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींतून इस्लाम मध्ये धर्मांतरित झाले आहेत.

इथे हे लक्षात घ्यायला हवे की भाजपा हा पहिला राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे ज्याने मुस्लिम समाजात जातीव्यवस्था अस्तित्वात असल्याचे नजरेस आणत या समाजातील पसमांदा मुस्लिमांच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकला आहे. पसमांदा मुस्लिमांनंतर मोदींच्या नेतृत्वात भाजपा उत्तर प्रदेशातील 10 हजार सूफी दर्ग्यांच्या माध्यमातून सूफी नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील 22राज्यांत यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्यायोगे, भाजपा मुस्लिम समाजातीलस्वमताग्रही वर्गाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मुस्लिम समाजामधील प्रभावशाली मुस्लिम धर्मगुरू आणि वरच्या वर्गातील मुस्लिम वर्ग ह्यांच्या लांगूलचालनाची महात्मा गांधींपासून सुरु झालेली परंपरा स्वातंत्र्यानंतर देखील काँग्रेस ने अबाधित ठेवली. परिणामी साधारण मुस्लिम जनतेचा उपयोग काँग्रेस करिता एक मतपेटी पुरता उरला. परिणामी साधारण मुस्लिम जनता अशिक्षित आणि अडाणी राहिली आणि देशातील विकासाची फळे मुस्लिमांमधील वरच्या स्तरातील वर्गाने म्हणजे अश्रफ ह्यांनी लाटली, जे सरकारने नेमलेल्यासच्चर कमिटीच्या अहवालाप्रमाणे आपला उगम विदेशात असल्याचा, अथवा इस्लाम मध्ये धर्मांतरित झालेल्या हिंदूंमधील उच्च वर्गात असल्याचे मानतात. नरेंद्र मोदींनी ह्या मुसलमानांमधील उपेक्षित वर्गाची प्रथम दखल घेतली. ह्यापूर्वी पीडित मुस्लिम महिलांच्या तलाक विरोधातील लढ्याला सक्रिय पाठिंबा देऊन मोदींनी त्यांच्या सद्भावना मिळवल्या आहेत. आजपर्यंत काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष इत्यादी पक्षांनी मुस्लिम समाजाचा केवळ मतपेटी म्हणून वापर केला. ह्या समाजाला देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा या पक्षांनी कधीही प्रयत्न केला नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष मुस्लिम समाजाला देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील शांती नांदावी तसेच भारतीय समाजातील सर्व समाज घटकांच्या प्रगतीकरिता देशातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या या प्रयत्नांचे स्वागत, केवळ राजकीय चष्म्यातून न बघता करायला हवे.

 

 

डॉ. प्रशांत देशपांडे
भ्रमणध्वनी (9764052420)

Post Views: 210
Previous Post

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने संपवलं आयुष्य, कारण अस्पष्ट

Next Post

मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी ”टीव्ही ९ मराठीचा ”आपला बायोस्कोप”

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी ”टीव्ही ९ मराठीचा ”आपला बायोस्कोप”

मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी ''टीव्ही ९ मराठीचा ''आपला बायोस्कोप''

ताज्या बातम्या

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

July 2, 2026
डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेवर ‘आदर्श शाळा’ पुरस्काराची मोहोर गुणवत्तेचा गौरव 

July 2, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

July 2, 2026

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन सन्मान योजनेंतर्गत ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

July 2, 2026
हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

July 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0954878

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!