Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जागतिक हवामान परिषद यंदा दुबईत, ‘सीओपी-२८’ उद्दिष्ट साधणार? ‘सीओपी’ म्हणजे काय ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 5, 2023
in india
0
जागतिक हवामान परिषद यंदा दुबईत, ‘सीओपी-२८’ उद्दिष्ट साधणार? ‘सीओपी’ म्हणजे काय ?
0
SHARES
125
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने तीस वर्षांपूर्वी सुमारे दीडशे देशांनी, वातावरणीय बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्नांच्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या.

संयुक्त राष्ट्रांची वार्षिक जागतिक हवामान परिषद (सीओपी – २८) यंदा दुबईत सुरू आहे. येत्या १२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेला जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी हजेरी लावली. भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. त्यांनी वातावरण बदलांसंदर्भात भारताची भूमिका पुन्हा ठामपणे मांडली. कोळसा आणि अन्य जीवाश्म इंधनांचा म्हणून वापर संपूर्णपणे थांबवावा, अशा अर्थाची मागणी विकसित देशांकडून या परिषदेत वारंवार करण्यात येते. भारताचा या मागणीला विरोध आहे. कोळशाचा वापर कमी करत एके दिवशी संपूर्णपणे थांबविला पाहिजे, हे आपल्याला तत्त्वत: मान्य आहे; मात्र, भारतासारख्या देशाला ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या तरी कोळशावर अवलंबून राहण्याखेरीज पर्याय नाही. केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील अनेक प्रमुख विकसनशील देशांची हीच परिस्थिती आहे. अगदी चीनचाही या मुद्द्यावर भारताला पाठिंबा आहे. दोन वर्षांपूर्वी ग्लासगो येथे झालेल्या ‘सीओपी-२६’मध्ये भारत व चीनच्या दबावामुळेच परिषदेच्या मसुद्यातून ‘कोळशाचे तत्काळ उच्चाटन’ याऐवजी ‘कोळशाचे कालबद्ध उच्चाटन’ असा बदल करण्यात आला होता. यानिमित्ताने ‘सीओपी’विषयी अधिक जाणून घेणे इष्ट ठरेल.

‘सीओपी’ म्हणजे काय?

संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने तीस वर्षांपूर्वी सुमारे दीडशे देशांनी, वातावरणीय बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्नांच्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार पहिली हवामान परिषद (सीओपी – कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज) बर्लिन येथे १९९५ मध्ये भरली. तेव्हापासून दर वर्षी ही परिषद नियमितपणे भरते आहे. पॅरिस येथे २०१५ मध्ये झालेल्या एकविसाव्या हवामान परिषदेत (सीओपी २१) सुमारे १९० देशांनी ‘पॅरिस करारा’वर स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार जागतिक तापमानवाढ सरासरी दोन अंश सेल्सियसने – निदान दीड अंश सेल्सियसने – कमी करण्याचा निर्धार सर्व देशांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी आखून दिलेल्या मार्गाने ‘पॅरिस करारा’तील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दर वर्षीच्या परिषदेत वेगवेगळे मार्ग सुचविले जातात. मात्र, जगातील सर्व देशांनी कोणत्या पद्धतीने ही तापमानवाढ घटवावी, याविषयी स्पष्टता नसल्याने विकसित देश आणि विकसनशील देशांत यावरून वाद झडत राहिले आहेत.

दुबई परिषद वादात का?v

‘सीओपी’ दर वर्षी वेगवेगळ्या देशांत भरत असते. त्यावरूनही अनेकदा वाद होत असतात. मात्र, यंदा हे यजमानपद दुबईला दिल्याने जगभरातील पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. संयुक्त अरब अमिरात हा जगातील एक प्रमुख क्रूड तेल उत्पादक देश आहे. क्रूड तेल हे जीवाश्म इंधन असल्याने ते कोळशाप्रमाणेच जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरते, हे सर्वविदीत आहे. अशा तेल उत्पादक देशाला पर्यावरण संरक्षणाची चर्चा करण्यासाठीच्या परिषदेचे यजमानपद देणे आणि त्यातही दुबईच्या राष्ट्रीय तेल उत्पादक कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला – सुलतान अल् जबेर यांना – या परिषदेचे अध्यक्ष करणे यासारखी विसंगती दुसरी नाही, अशी टीका जगभरातून झाली. मात्र, यजमान देशाने या टीकेकडे दुर्लक्ष केले आणि दुबईने पर्यावरण संरक्षणासाठी किती आणि कसे प्रयत्न केले आहेत, याची जोरदार जाहिरात यानिमित्ताने जगभरातून आलेल्या प्रतिनिधींसमोर केली. मे महिन्यात अमेरिकी काँग्रेस आणि युरोपीय पार्लमेंटच्या शंभरहून अधिक सदस्यांनी अल् जबेर यांनी या परिषदेचे अध्यक्षपद सोडावे, अशी जोरदार मागणी केली होती. मात्र, अमेरिकेच्या अध्यक्षांचे विशेष पर्यावरण दूत जॉन केरी यांनी अल् जबेर यांच्या नियुक्तीचे स्वागत केले होते.

भारताचे म्हणणे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला हजेरी लावली. जगात सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या अमेरिका व चीन या दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख मात्र या परिषदेला गैरहजर राहिले. भारताने पर्यावरण संरक्षणाच्या योजनांना कायमच पाठिंबा दिला आहे. मात्र, अजूनही भारताची ऊर्जेची ७० टक्के गरज कोळसाच पुरवू शकतो. अमेरिका व इतर काही युरोपीय देशांकडे नैसर्गिक वायूचे भरपूर साठे आहेत. त्यामुळे ते कोळशाचा वापर घटवू शकतात. भारताची स्थिती मात्र तशी नाही. शिवाय नैसर्गिक वायू हेही जीवाश्म इंधनच आहे. त्यामुळे जीवाश्म इंधनांचा वापर पूर्णपणे बंद करणे व्यावहारिकदृष्ट्या सध्या अशक्य आहे, असे भारताचे म्हणणे आहे. भारताच्या या भूमिकेला अनेक विकसनशील देशांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भारताचे म्हणणे विचारात घेतल्याशिवाय पर्यावरण परिषदांना यश लाभू शकत नाही, हे वास्तव आहे.

Post Views: 179
Previous Post

LIVE | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Next Post

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक

ताज्या बातम्या

आता मुलांना मिळणार सर्व लसीकरण #marathinews

May 16, 2026

मनीषा मानेवर दोष निश्चितीला वेळ #solapurnews

May 16, 2026

हडपसर मध्ये बॉम्ब ठेवणारा शिवाजी राठोड सोलापूरचा

May 16, 2026

रोटरीची आशा एक्सप्रेस करणार महिलांच्या मोफत कॅन्सर टेस्ट

May 16, 2026

मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात संपूर्ण रस्त्यावर रंग विखुरला #viral #marathinews

May 16, 2026

जिल्हापरिषदेच्या सीईओनी केले नो व्हेईकल डे चे आवाहन #solapurnews

May 16, 2026

इस्लापूर येथे जलजीवन मिशनच्या मेन लाईनला गळती #marathinews

May 16, 2026

कळंब येथे बिर्याणी सत्याग्रह अनोखे आंदोलन #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866968

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697