आव्हाना प्रतिनिधी.भोकरदन तालुक्यातील सेलूद येथील कान्होपात्रा या विठ्ठल व वारकरी संप्रदायाच्या 15 व्या शतकातील संत होत्या.रूपाने अत्यंत सुंदर असणाऱ्या कान्होपात्रावर बिदर च्या निजामाची वक्र दृष्टी पडली व त्या पासून वाचण्यासाठी त्या पंढरपूर नगरी आल्या व पंढरपूरी जेथे त्यांनी देह ठेवला तेथे वाघाटी ज्यास तरटी असे म्हणतात ती वेल उगवली ,या वेलीस कान्होपात्रा चे झाड म्हणून पूजण्याची15 व्या शतकापासून प्रथा पडली.पंढरपूरला गेल्यावर आधी दर्शन या झाडाचे व मग विठू माऊलीचे घ्यावे लागते.
मात्र पंढरपूर येथील ही 500 वर्ष पुरातन ऐतिहासिक महावेल आता सुकली आहे व फक्त खोड म्हणून तिचे अस्तित्व असून त्याचे च पूजन आता होते.सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक व दुर्मिळ प्रजाती वाचविणारे डॉ.संतोष पाटील यांनी ही वाघाटी ची रोप निर्माण करून ती विविध मंदिर परिसरात लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून ,याचाच भाग म्हणून आज प्रख्यात कीर्तनकार व निसर्ग स्नेही ह भ.प.ज्ञानेश्वर महाराज सेलूदकर यांच्या हस्ते सेलूद येथील संत गजानन महाराज आश्रमात विधिवत लावण्यात आले.
अध्यात्मिक महत्व- या वेलीच्या फळांना गोविंद फळ म्हणतात.आषढि एकादशी झालेवर द्वादशी ला या फळांची भाजी करून उपवास सोडण्याची वारकरी संप्रदायात परंपरा आहे.भक्ती विजय या ग्रंथात रुख्मिनी लावी शीडी वाघाटी चे वेली, तसेच कान्होपात्रा तराटी झाहली ही ओवी ही आहे.
पर्यावरनीय महत्त्व- इंडियन वांडेरर सह 7 प्रजातींची फुलपाखरांची अळी अवस्था वाघाटी ची पाने खाऊन यावर कोष बनवतात व त्यांचे जीवनचक्र यावर विसंबून आहे.आयुर्वेदात गोविंद फळ हे पित्त नाशक म्हणून परिचित आहे. ———————————————-साहित्य महिमा- मागुती बोले पुजाऱ्याला ।।कान्हो वृक्ष जाहली कैसी llत्यांनी दक्षिणद्वारापासी तरटी वृक्ष दाखविला ।। ———————- *हरित वारी*-माझ्या हरित वारी या उपक्रमात “हरी” हा शब्द विठू माऊलीचा व निसर्गाचा आहे.
वारकरी संप्रदायात महत्त्व असलेल्या वाघाटी चे शास्त्रीय नाव “कॅपारिस झायलेनिका” असे असून तीस तरटी असे ही म्हणतात.ही महावेल असून ती हळू वाढणारी व दीर्घ आयुषी असून विशेषतः ती खूप जुन्या वड ,पिंपळ , आधी वृक्षांवर आधाराने वाढीस लागते.महाराष्ट्रात ही मोजक्या च ठिकाणी आढळून आली आहे.अनेक पक्षांना हिची फळे प्रिय असून त्या द्वारे हिचा बीज प्रसार होतो मात्र कच्ची च फळ पक्षी अधिक खातात त्यामुळे ही वेल अत्यंत दुर्मिळ झाली आहे.माझ्या हरित वारी या उपक्रमा अंतर्गत आज सेलूद मंदिरी रोपण करण्यात आले व अजून एकादशी पर्यन्त विविध देवस्थानात एकादश म्हणजे अकरा रोप लावून ही जैवविविधता संवर्धित करत आहे.- डॉ संतोष पाटील,पर्यावरण संवर्धक, अभिनव प्रतिष्ठान,सिल्लोड